Ads

Wednesday, May 5, 2021

करोना IPLच्या बायो बबलमध्ये कसा आला आणि पसरला; वाचा त्या दिवशी नेमक काय झाले

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४वा हंगाम सुरू असताना बाय बबलमध्ये करोना झालेली पहिली व्यक्ती म्हणजे कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू होय. त्यानंतर एका पाठोपाठ एक दोन खेळाडूंना करोना झाला. यात केकेआर संघातील संदीप वॉरिअरचा समावेश होता. पण हा व्हायरस दिल्ली संघात कसा काय पोहोचला. जाणून घेऊयात करोनाचा आयपीएलमधील प्रवास कसा झाला त्याबद्दल... वाचा- गेल्या आठवड्यात आयपीएलच्या १४व्या हंगामात कोरनासाठीचे निश्चित करण्यात आलेले नियम पाळले गेले नाहीत. बीसीसीआयने प्रत्येक संघाला दिलेले जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइ खराब असल्याची टीका संघांनी केली. त्यानंतर बीसीसीआयने प्रत्यक्षात करोना बायो बबलमध्ये कसा आला आणि तो कसा पसरला याची चौकशी केली. वाचा- वरुण चक्रवर्ती गेल्या आठवड्यात रुग्णालयात गेला होता आणि तो पुन्हा जेव्हा आयपीएलच्या बायो बबलमध्ये आला तेव्हा करोनाने शिरकाव केल्याचे सर्वांना माहिती आहे. पण हे नेमके झाले तरी कसे? वाचा- बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, वरुण चक्रवर्तीला स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात देण्यात आले होते. त्यानंतर तो अहमदाबाद येथे संघ थांबलेल्या हॉटेलमध्ये आला. तेथे तो संदीप वॉरिअर सोबत एकत्र जेवला. ही घटना १ मे रोजीची... त्यानंतर या दोघांनी कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या अन्य खेळाडूंसोबत सरावाला जाण्यासाठी एकत्रपणे प्रवास केला. तेव्हा वरुणची प्रकृती ठिक नसल्याने त्याला हॉटेल रुममध्ये आयसोलेट करण्यात आले. पण संदीप मात्र सराव सत्रात सहभागी झाला. त्याच वेळी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सराव करत होता. दिल्ली कॅपिटल्सचे सराव सत्र संपण्याची वेळ आणि कोलकाता संघाची सराव सुरु करण्याची वेळ एकच ठरली. तेव्हा संदीप आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांची भेट झाली. या दोन्ही खेळाडूंनी काही वेळ चर्चा केली. वाचा- ... आमित मिश्रा हॉटेल रुममध्ये परतल्यावर त्याची प्रकृती बिघडली. यामुळे अमितला आयसोलेट करण्यात आले आणि त्याची करोना चाचणी घेण्यात आली. आता या दोन्ही संघातील खेळाडूंची दररोज करोना चाचणी घेतली जात आहे. ज्यामुळे हे समजू शकेल की अन्य कोणाला लागण झाली आहे का? सध्या तरी या दोन्ही संघातील सर्व खेळाडूंचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vMuJUH

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...