Ads

Monday, May 17, 2021

भारत दौऱ्याआधी श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंनी बोर्डाला दिली निवृत्तीची धमकी

नवी दिल्ली: भारताचा संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही देशात प्रत्येकी ३ सामन्यांची टी-२० आणि वनडे मालिका होणार आहे. पण या मालिकेच्या आधीच श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला एक मोठा धक्का बसला आहे. आणि बोर्ड यांच्यात वाद वाढत चालला आहे. यामुळेच आता लंकेच्या खेळाडूंनी वेळेआधीच निवृत्ती घेण्याची धमकी दिली आहे. वाचा- खेळाडूंनी धमकी देण्यामागे कारण आहे बोर्डाने नव्याने सुरू केलेली ग्रेडिंग सिस्टम होय. या सिस्टमद्वारे क्रिकेटपटूची वार्षिक कमाई ठरवली जाते. नव्या ग्रेडिंग सिस्टममध्ये प्रत्येक खेळाडूला गुण दिले जाणार आहेत. संडे टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार खेळाडूंच्या प्रतिनिधींनी बोर्डाला सांगितले आहे की जेव्हा गुण दिले जातील तेव्हा त्यामध्ये संबंधित खेळाडूला देखील सहभागी करून घेतले जाईल. वाचा- - सचिन तेंडुलकर याबाबत सर्व खेळाडूंचे एकमत असून ते ठाम आहेत. दुसऱ्या बाजूला श्रीलंका क्रिकेट मॅनेजमेंट समितीचे सदस्य एश्ले डिसिल्वा यांनी सांगितले की, खेळाडूंच्या मागणीनुसार करारात सुधारणा करण्यात आल्या आहेत. आम्ही कराराला अंतिम स्वरुप दिल्यानंतर सिनिअर खेळाडूंशी चर्चा करणार आहे. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी करणार नाही असे म्हटले नाही. काय आहे क्रिकेटपटूंची मागणी श्रीलंकेच्या खेळाडूंच्या मते ग्रेडिंग सिस्टम अधिक पारदर्शक केली जावी. खेळाडूंना कोणत्या आधारावर गुण दिले जाणार आहेत. कारण यामुळे थेट त्यांच्या कमाईवर परिणाम होणार आहे. बोर्डाने नव्या सिस्टममध्ये खेळाडूंना चार गटात विभागले आहे. यात गेल्या दोन वर्षातील त्यांचा फिटनेस, शिस्त्र , नेतृत्वगुण, टीममधील योगदान, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांची कामगिरी यानुसार गुण दिले जाणार आहेत. वाचा- एका बाजूला श्रीलंका बोर्ड आणि खेळाडू यांच्यात वाद सुरू असताना जुलै महिन्यात भारतीय संघ लंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी-२० आणि वनडे मालिका होणार असल्याचे वृत्त आहे. काही क्रिकेट वेबसाइट्सनी दिलेल्या वृत्तानुसार १३ जुलै रोजी वनडे मालिकेने दौऱ्याची सुरुवात होईल. त्यानंतर १६ आणि १९ रोजी लढती होतील. टी-२० सामने २२, २४ आणि २७ दिवशी होईल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uZX5Le

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...