Ads

Monday, May 17, 2021

भारतीय संघाबरोबर गेल्या ८९ वर्षांत ही गोष्ट कधीच घडली नव्हती, पण पुढच्याच महिन्यात ती वेळ येणार

नवी दिल्ली : आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासामध्ये गेल्या ८९ वर्षांत ही गोष्ट कधीच घडली नव्हती. पण पुढच्याच महिन्यात ही गोष्ट भारतीय संघाबरोबर होणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भारताचे सर्व खेळाडू सध्याच्या घडीला मायदेशात आहेत. पण पुढच्या महिन्यात भारतीय संघ इंग्लंडमध्ये रवाना होणार आहे. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. भारतीय संघ गेल्या ८९ वर्षांत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळण्यासाठी पहिल्यांदा उतरणार आहे. आयसीसीने ज्या देशांना कसोटी क्रिकेटचा दर्जा दिला आहे त्यांच्यापैकी फक्त दोन देश असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळलेले नाहीत. या दोन देशांमध्ये भारत आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. कारण आतापर्यंत आयसीसीच्या उर्वरीत १० देशांनी तरी तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळलेले आहेत. आता भारतीय संघ पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडमध्ये १८ जूनपासून विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताचे सर्व खेळआडू १९ मे या दिवशी मुंबईमध्ये एकत्र येणार आहेत. त्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचे समजते आहे आणि त्यानंतर ते इंग्लंडला रवाना होणार आहेत. १०९ वर्षांपूर्वी तटस्थ ठिकाणी खेळवला होता कसोटी सामनातटस्ठ ठिकाणी पहिला कसोटी सामना हा १०९ वर्षांपूर्वी खेळवला गेला होता. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झाला होता. हा सामना २७ मे १९१२ या दिवशी सुरु झाला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना दोन दिवसांतच जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर एक डाव आणि ८८ धावांनी विजय मिळवला होता. ही एक तिरंगी मालिका होती, ज्याचे यजमानपद इंग्लंडकडे होते. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे तीन देश खेळले होते. त्यानंतर १९९९ साली तटस्ठ ठिकाणी कसोटी सामने खेळवण्यात आला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33MqfBv

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...