Ads

Sunday, May 16, 2021

रोहित शर्माबाबत संजय मांजरेकर यांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले ही गोष्ट करावीच लागणार...

नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माबाबत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भविष्यात रोहितबाबत नेमकं काय होऊ शकतं, हे मांजरेकर यांनी यावेळी सांगितले आहे. मांजरेकर यावेळी म्हणाले की, " रोहित शर्मापुढे आता एक मोठे आव्हान असणार आहे. कारण आता एक सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. कारण रोहितने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. पण इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणे सोपे नसते. त्यामुळे आता रोहितची मोठी परिक्षा इंग्लंडमध्ये पाहायला मिळणार आहे." भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे. भारताचा सामना यावेळी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला सातत्याने यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे भारतासाठी ही मालिका सर्वात महत्वाची असेल. त्याचबरोबर यावेळी रोहितबरोबर सलामीला शुभमन गिलला पाठवायचे की मयांक अगरवालला, हा मोठा निर्णयही संघाला घ्यावा लागणार आहे. मांजरेकर यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे की, " रोहितची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो आता चेंडू शरीराच्या जास्त जवळ जाऊन खेळतो, त्यामुळे त्याची फलंदाजी चांगली होते. ऑफ स्टम्पच्या बाहेरचे चेंडू तो सोडून देतो, त्याचबरोबर त्याचे पदलालित्यही उत्तम असते. पण इंग्लंडमध्ये त्याच्या फलंदाजीची परिक्षा होईल. एक फलंदाज म्हणून रोहितला काही बदल नक्कीच करावे लागतील. कारण इंग्लंडचे वातावरण आणि खेळपट्टी या वेगळ्या असतात आणि तिथे फलंदाजी करणे सोपे नसते." इंग्लंडमध्ये जर रोहितला चांगली फलंदाजी करायची आहे तर त्याला नक्कीच बदल करावे लागतील. यावेळी रोहितला इंग्लंडमधील खेळपट्टीनुसार फलंदाजीमध्ये काही बदल करावे लागतील. कारण इंग्लंडमधील खेळपट्टी ही गोलंदाजांना मदत करत असते आणि तिथे फलंदाजी करणे सोपे नसते. त्यामुळे आता रोहित आपल्या फलंदाजीत कोणता बदल करतो, ते पाहावे लागेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tSWaum

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...