Ads

Monday, May 17, 2021

करिअरमध्ये १०-१२ वर्ष या गोष्टीचा त्रास झाला, सामन्याच्या आधी झोप लागत नव्हती; सचिन तेंडुलकरने केला मोठा खुलासा

मुंबई: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने २४ वर्ष देशाचे प्रतिनिधित्व केले. या काळात सचिनने अनेक विक्रम नोंदवले. जगातील सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या सचिनने त्याच्या करिअरमधील एक मोठा खुलासा केलाय. क्रिकेट करिअरमध्ये एका मोठा कालावधी तणावामध्ये घालवल्याचे सचिनने रविवारी सांगितले. करोना व्हायरसमुळे बायो बबलमध्ये अधिक वेळ असणाऱ्या क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल सचिन बोलत होता. यावर मात करण्यासाठी गोष्टी स्विकारण्याची गरज आहे, असे तो म्हणाला. वाचा- अनअकॅडमीद्वारे आयोजित एका चर्चे सत्रामध्ये बोलताना सचिन म्हणाला, जस जसा वेळ गेला मला याची जाणीव झाली की खेळण्यासाठी शारिरीक तयारी सोबत स्वत:ला मानसिकरित्या तयार करण्याची गरज आहे. माझ्या डोक्यात मैदानात प्रवेश करण्याआधी सामना सुरू झालेला असायचा. तेव्हा तणाव हा खुप जास्त असायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या सचिनने सांगितले की, माझ्या करिअरमध्ये १० ते १२ वर्ष तणावामध्ये घालवले. असे अनेकदा झाले आहे की सामना सुरू होण्याआधी रात्री मला झोप येत नसे. पण नंतर मी हे मान्य केली की ही माझ्या तयारीचा एक भाग आहे. काही वर्षानंतर मी ही गोष्ट मान्य केली की, मला रात्री झोपताना त्रास होतोय. त्यामुळेच मन स्थिर ठेवण्यासाठी मी आणखी काही तरी करायचो. वाचा- काही तरी करायचो यामध्ये फलंदाजीचा सराव, टीव्ही पाहणे, व्हिडिओ गेम्स खेळणे, सकाळी चहा बनवणे अशा गोष्टींचा समावेश होता, असे सचिन म्हणाला. सामना सुरू होण्याआधी चहा करणे, कपड्यांना इस्त्री करणे अशा गोष्टी केल्यामुळे स्वत:ला क्रिकेट खेळण्यासाठी तयार करण्यास मदत होते. मला या गोष्टी भावाने शिकवल्या. मी सामन्याच्या एक दिवस आधी स्वत:ची बॅग तयार करायचो आणि ही एक सवय झाली. मी भारताकडून खेळलेल्या अखेरच्या सामन्यापर्यंत ही गोष्ट करायचो, असे सचिनने सांगितले. वाचा- चं खेळाडूंना कठीण वेळाचा सामना करावा लागतो. पण हे देखील गरजेचे आहे की त्यांनी या कठीण काळाचा स्विकार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही जखमी होता तेव्हा फिजिओ तुमच्यावर उपचार करतात. मानसिक आरोग्याबाबत देखील हीच गोष्ट आहे. कोणासाठीही चांगली-वाईट वेळ ही सामान्य गोष्ट आहे, असे सांगताना सचिन म्हणाला, यासाठी तुम्हाला गोष्टींचा स्वीकार करावा लागले. ही गोष्ट फक्त खेळाडूंसाठी नाही तर त्यांच्या सोबत असणाऱ्यांना देखील लागू होते. जेव्हा तुम्ही गोष्टी मान्य करता तेव्हा त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करता. हॉटेल कर्मचाऱ्याने दिला सल्ला सचिनने चन्नईतील हॉटेलमध्ये एका कर्मचाऱ्याने दिलेला सल्ल्याची आठवण सांगितली. माझ्या रुमध्ये एक कर्मचारी डोसा घेऊन आला. त्याने डोसा टेबलवर ठेवल्यानंतर मला एक सल्ला दिला. माझ्या एल्बो गार्डमुळे बॅटीने खेळता येत नाही असे सांगितले. तो जे बोलला होता ते खरे होते. त्याच्या सल्ल्याने मी प्रश्नावर मात करू शकलो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3yhkFoz

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...