Ads

Tuesday, May 4, 2021

करोनाच्या संकटानंतर आता IPLच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुंबई: ला करोना जोरदार झटका दिला आहे. बायो बबलमध्ये असणारे काही खेळाडू आणि संघाच्या सपोर्ट स्टाफला करोना झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला आतापर्यंत दोन सामने स्थगित करावे लागले आहे. काल सोमवारी कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोना झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची बेंगळुरू विरुद्धती लढत पुढे ढकलण्यात आली. त्याच बरोबर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे गोलंदाजाचे प्रशिक्षक एल बालाजी यांना करोना झाल्याने त्यांची बुधवारी ५ मे रोजी होणारी लढत स्थगित करण्यात आली. वाचा- आयपीएल २०२१ मध्ये सध्या दिल्ली आणि अहमदाबाद येथे लढती सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी असलेल्या बायो बबलमध्ये करोनाचे शिरकाव केलाय. त्यामुळे आता बीसीसीआयकडून आयपीएलच्या उर्वरीत लढती मुंबईत घेण्याच्या हलचाली सुरू आहेत. या बातमीनंतर आयपीएलच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईत करोनाची परिस्थिती भीषण असताना आयपीएलचे सामने खेळवणे धोकादायक असल्याचे म्हणत वकील अॅड वंदना शहा यांनी केलेल्या जनहित याचिकेत केली आहे. वाचा- मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दखल घेत गुरुवारी ठेवली सुनावणी आहे. उच्च न्यायालयाने आणि अन्य प्रतिवादींना नोटीस देण्याची याचिकादारांना सूचना केली आहे. काय झाले कोर्टात... बायोबबलमध्ये आयपीएल खेळली जाणार आणि हे बबल करोनापासून संरक्षण देऊ शकते वगैरे दावा बीसीसीआयकडून करण्यात आला होता. मात्र, दोन खेळाडू आणि तीन गाऊंड स्टाफ करोनाने बाधित झाले, यावरून बायो बबल सुरक्षित नसल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे आयपीएल सामने थांबवायला हवे. आयपीएल सामने खेळवण्यासाठी तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च होत असल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआयने हाच पैसा खरे तर करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन इत्यादीचा पुरवठा होण्यासाठी आणि फ्रंटलाइन वर्कर्ससाठी द्यायला हवे’, असे म्हणणे जनहित याचिकादार अॅड. वंदना शाह यांनी मांडले. तेव्हा, ‘आणखी किती सामने व्हायचे राहिले आहेत’, अशी विचारणा खंडपीठाने त्यांना केली. त्यावर आजच्या टाइम्स ऑफ इंडियामधील बातमीनुसार, आता तर सर्व सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये हलवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतील करोनाचे संकट आणखी वाढण्याची भीती आहे’, असे म्हणणे अॅड. शाह यांनी मांडले. त्यानंतर आम्ही केवळ मुंबई व महाराष्ट्रापुरता विचार करू, त्यामुळे तुम्ही प्रतिवादींना नोटीस द्या, आम्ही परवा, गुरुवारी याप्रश्नी सुनावणी घेऊ, असे खंडपीठाने स्पष्ट केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uhx0qh

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...