Ads

Thursday, May 6, 2021

IPL SUSPENDED : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी घरी पोहोचल्यावर चाहत्यांना दिला खास मेसेज, व्हिडीओ झाला व्हायरल....

नवी दिल्ली : आयपीएल स्थगित केल्यानंतर मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू आपल्या घरी पोहोचले आहेत. घरी पोहोचल्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बमराह, अष्टपैलू जयंद यादवसह काही खेळाडूंनी आपल्या चाहत्यांसाठी एक खास मेसेज दिला आहे. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित यावेळी म्हणाला की, " आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही गोष्ट दुर्देवी आहे. पण भारतामध्ये जी काही परिस्थिती आहे ते पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. माझ्यामते हा एक चांगला निर्णय आहे. आपण सर्व गोष्टींकडे पाहायला हवं आणि त्यासाठी हा एक महत्वाचा निर्णय आहे, असे मला वाटते. सध्याच्या घडीला गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व लोकांनी नियम पाळणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर जी मार्गदर्शक तत्व सांगितली आहेत त्यांचेही पालन सर्वांनी करायला हवे." मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ पोस्ट करत असताना आपल्या चाहत्यांना एक संदेशही दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, " आतापर्यंत तुम्ही जो आम्हाला पाठिंबा दिलात त्याबद्दल तुमचे आभार. आपण पुन्हा भेटेपर्यंत तुम्ही सुरक्षित राहा आणि सर्वांची काळजी घ्या." आपल्या संघातील परदेशी खेळाडूंना मायदेशी पोहोचवण्यासाठी मुंबई इंडियन्सने आता स्वत:हून मदतीचा हात पुढे केला आहे. कारण मुंबई इंडियन्सचा संघ आता परदेशी खेळाडूंना आता आपल्या खासगी चार्टड विमानांमधून मायदेशी सोडणार आहे. मुंबई इंडियन्स दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये आपले खासगी विमान पाठवणार आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी अन्य संघाच्या मालकांसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. अन्य संघातील कोणत्या परदेशी खेळाडूला मायदेशी सोडायचे असेल तर त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ मदत करणार आहे. येत्या २४ ते ४८ तासांमध्ये ही मुंबई इंडियन्सची खासगी विमानं रवाना होणार आहेत. त्यामुळे येत्या २-३ दिवसांमध्ये परेदशी खेळाडूंना त्यांचा मायदेशात पोहोचवण्यात मुंबई इंडियन्सचा संघ यशस्वी ठरू शकणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3h6BOva

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...