Ads

Wednesday, May 5, 2021

IPL SUSPENDED : गर्लफ्रेंडबरोबर बोलत असल्याचे सांगून तो पळाला आणि आयपीएलमध्ये भयानक प्रकार घडला...

नवी दिल्ली : आयपीएलच्या मैदानात एक भयानक प्रकार घडल्याचे आता समोर येत आहे. आयपीएलच्या मैदानात ही व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडबरोबर बोलत असल्याचे सांगत होती. त्यावेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून गेला. पण पळ काढण्यापूर्वी त्या व्यक्तीने एक भनायक प्रकार केल्याचे आता समोर आले आहे. नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...आयपीएलमधील २ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु होता. आयपीएलचे सामने नवी दिल्लीच्या मैदानात सुरु असताना एक व्यक्ती एकांतामध्ये जाऊन मोबाइलवर बोलत असायचा. पण एका सामन्यावेळी एकांतामध्ये हा व्यक्ती नेमकं काय करतोय, हे पाहण्यासाठी तेथील अधिकारी गेले. त्यावेळी आपण आपल्या गर्लफ्रेंडबरोबर बोलण्यासाठी एकांत ठिकाणी आलो आहोत, असे त्याने सांगितले. ही व्यक्ती मैदानातील सफाई कर्मचारी होती. त्यामुळे एकांतामध्ये ही व्यक्ती नेमकं काय करत आहे, याचा संशय सर्वांना आला. त्यावेळी त्या व्यक्तीकडे त्याच्या गर्लफ्रेंडचा मोबाइल नंबर मागण्यात आला. त्यावेळी ती व्यक्ती घाबरली आणि आपल्या जवळ असलेले दोन मोबाईल टाकून तिथून पळून गेली. पण तिथून पळून जाण्यापूर्वी या व्यक्तीने भयानक गोष्ट केलेली होती. जेव्हा ही व्यक्ती फोनवर बोलत होती तेव्हाच त्याच्याबाबत संशय आला होता. पण तो जेव्हा पळून गेला त्यानंतर जो प्रकार घडला आहे त्याचा उहापोह झाला. ही व्यक्ती एक सट्टेबाज होता. जेव्हा मैदानात सामना होतो आणि त्याचे प्रसारण जेव्हा टीव्हीवर होत असते त्यामध्ये काही कालावधीचे अंतर असते. त्यामुळे मैदानात जी गोष्ट घडते ती तेव्हाच टीव्हीवर दिसत नाही. या गोष्टीचाच फायदा या सट्टेबाजाने घेतला होता. या सट्टेबाजाने मैदानात घडलेल्या प्रत्येक चेंडूमागची गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना सांगितली होती आणि मैदानातूनच सट्टेबाजी चालत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता आयपीएलचे सामने भरवताना मैदानातील स्टाफ नेमका कोण आहे, याकडेही बीसीसीआयला लक्ष द्यावे लागणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33kqOSN

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...