Ads

Wednesday, May 5, 2021

IPL SUSPENDED : आयपीएल स्थगित झाल्यावरही श्रेयस अय्यर आणि बेन स्टोक्सला सर्वाधिक मानधन, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : आयपीएल स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएल खेळलेल्या खेळाडूंना किती पैसे मिळणार, यावर आता जोरदार चर्चा सुरु आहे. पण आयपीएल स्थगित झाली असली तरी दिल्ली कॅपिटल्सचा श्रेयस अय्यर आणि बेन स्टोक्स यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. आयपीएलच्या नवीन नियमांप्रमाणे आता आयपीएल खेळलेल्या खेळाडूंपेक्षा जास्त पैसे श्रेयस आणि स्टोक्स यांना मिळणार आहेत. आयपीएलचा नियम काय सांगतो, पाहा...आयपीएलमधील प्रत्येक संघाने आपल्या खेळाडूंची एका वर्षाची रक्कम ठरवलेली असते. त्यानुसारच खेळाडूंना पैसे मिळत असतात. यामध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांचे तीन विभाग करण्यात आलेले असतात. आयपीएल सुरु असताना खेळाडूंना मधील पहिला वाटा मिळतो. त्याचबरोबर आयपीएल संपल्यावर खेळाडूंना पैशांचा दुसरा वाटा मिळतो. आयपीएल संपल्यानंतर वर्षाच्या शेवटी खेळाडूंनी उर्वरीत रक्कम मिळत असते. त्यामुळे आता आयपीएल मध्यावर स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना आता १/३ एवढीच रक्कम मिळणार आहे. श्रेयस आणि स्टोक्सचा कसा फायदा होणार...बीसीसीआयने दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी २०११ साली एक नवीन पॉलिसी बनवली आहे. त्यानुसार कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली किंवा अपघात झाला तर त्याला पूर्ण रक्कम संघाला द्यावी लागते. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे एकही सामना खेळला नसला तरी त्याला सात कोटी रुपये, ही ठरवलेली रक्कम त्याला मिळणार आहे. त्याचबरोबर बेन स्टोक्स आयपीएलमधील एक सामना खेळला होता, त्यानंतर त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आता १२.५० कोटी एवढी ठरवलेली रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर आयपीएल खेळत असताना ज्या खेळाडूंना दुखापतीमुळे किंवा अपघातामुळे स्पर्धेला मुकावे लागले त्यांना पूर्ण रक्कम मिळणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये जे खेळाडू खेळले त्यांना आता ठरवलेल्या रक्कमेच्या ३३ टक्के पैसे मिळणार आहे. आयपीएलचे उर्वरीत सामने खेळवल्यानंतर त्यांना ३३ टक्के रक्कम मिळेले आणि त्यानंतर वर्षाअखेरीस त्यांना ३३ टक्के रक्कम मिळणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला श्रेयस आणि स्टोक्स यांना चांगलाच फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3trwyF2

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...