नवी दिल्ली : सध्याच्या घडीला आयपीएलमधील सर्वात जास्त चिंता असेल ती ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची. कारण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्यांच्याच देशाने प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे नेमके काय होणार, याची चिंता बीसीसीआयला सर्वात जास्त असेल. पण आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारताबाहेर कसे पडणार, याचा संपूर्ण रोडमॅप तयार झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या प्रवासाबाबतची पूर्ण माहिती आता समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्यांच्या देशानेच प्रवेश नाकारला आहे, त्यांना आता १५ मेपर्यंत तरी आपल्या देशात जाता येणार नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आता भारतामध्येही राहणार नसल्याचे समजते आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे नेमके काय होणार, याची पूर्ण जबाबदारी आता बीसीसीआयने घेतलेली आहे. आयपीएलमधील जवळपास सर्व संघातील ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक त्याचबरोबर समाचोलक आणि पंच यांना दिल्लीमध्ये एकाच ठिकाणी थांबवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे तब्बल ३८ व्यक्ती आयपीएलमध्ये सहभागी झाले होते. दिल्लीमध्ये हे ३८ जणं एकत्र आल्यावरच त्यांना भारताबाहेर सोडण्यात येणार आहे. या ३८ जणांसाठी एक स्पेशल चार्टड विमान आयोजित करण्यात येणार आहे. या विमानाने एकत्रितपणे सर्व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक त्याचबरोबर समाचोलक आणि पंच मालदिवला रवाना होणार आहेत. त्यामुळे आता बीसीसीआय यापुढे त्यांची मदत कशी करणार, याची माहिती पुढे आलेली नाही. पण हे खेळाडू आता १५ मेपर्यंत तरी मालदिवमध्येच राहणर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सध्याच्या घडीला तरी १५ मे पर्यंत भारतामध्ये जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तींना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. पण जर ही मुदत वाढवण्यात आली आणि क्रिकेट मंडळानेही यामध्ये कोणतीच भूमिका घेतली नाही तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे नेमके काय होणार, याची सर्वात जास्त चिंता आहे. कारण सध्याच्या घडीला तरी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना १२ दिवस तरी मालदिवमध्येच राहावे लागणार आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या सरकारने जर विमानबंदीची मुदत वाढवली तर काय करायचे, हा सर्वात मोठा प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपुढे असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aZhZC7
No comments:
Post a Comment