नवी दिल्ली : भारतामधील आयपीएल करोनाच्या थैमानामुळे स्थगित करण्यात आले आहे. पण आता भारतामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकही रद्द होणार का, याची चर्चा सध्याच्या घडीला जोरात सुरु आहे. आयसीसी या विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेऊ शकते. पण भारतातला ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करण्याबद्दल आयसीसी कधी निर्णय घेणार, हे आता स्पष्ट करण्यात आले आहे. भारतामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक हा युएईमध्ये खेळवण्यात येऊ शकतो, असे तर्क-वितर्क आता लढवले जात आहेत. कारण भारतामधील करोनाचे वातावरण चिंताजनक आहे आणि त्यामध्ये लक्षणीय सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये जशी समस्या जाणवली तरी ती विश्वचषकाच्यावेळीही जाणवू शकते, त्यामुळे युएई हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. पण ट्वेन्टी-२० विश्वचषक हा भारतामधून रद्द करावा लागणार की खेळवणार, ही गोष्ट ठरवण्याची अंतिम तारीख अजून लांब आहे. भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय आयसीसी जुलै महिन्यामध्ये घेणार असल्याचे समजते आहे. कारण जर भारतामध्ये विश्वचषक खेळवायचा असेल तर त्यासाठी आयसीसीला तयारी करावी लागेल. त्याचबरोबर जर आयसीसीला भारताबाहेर ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवायचा असेल तर त्यांच्या हातामध्ये दोन महिन्यांचा कालावधी असेल. त्यामुळे आता जुलै महिन्यामध्ये भारतातल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे भवितव्य ठरणार आहे. आयसीसीमधील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, " भारतामधील करोनाच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सध्याच्या घडीला भारतामध्ये कसे वातावरण आहे, यावर आमचे लक्ष आहे. त्याचबरोबर यापुढेही आम्ही भारतामधील वातावरणावर लक्ष ठेवणार आहोत. भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करायचे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय आम्हाला जुलै महिन्यात घ्यावा लागणार आहे. कारण ट्वेन्टी-२० विश्वचषक आयोजित करण्यासाठी आणि सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्हीला काही दिवसांची गरज भासणार आहे. त्यामुळे भारतातील ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत आम्ही अखेरचा निर्णय हा जुलै महिन्यात घेणार आहोत."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33vO54p
No comments:
Post a Comment