मुंबई : आयपीएलचे २९ सामने झाल्यावर स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलमध्ये एकूण ६० सामने खेळवण्यात येणार होते आणि अजून ३१ सामने बाकी आहेत. आयपीएलचे हे उर्वरीत सामने कधी खेळवण्यात येणार, याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता मोठे वक्तव्य केले आहे. सध्याच्या घडीला तरी आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. या महिन्याभरात तरी आयपीएल पुन्हा होणार नाही. त्याचबरोबर पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कार्यक्रमही व्यस्त आहे. त्यामुळे आयपीएलचे उर्वरीत सामने कधी होणार, याची चिंता काही जणांना होती. पण बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. गांगुली याबाबत म्हणाले की, " सध्याच्या घडीला आयपीएलचे उर्वरीत सामने कधी खेळवण्यात येऊ शकतात, याचा विचार बीसीसीआय करत आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असेल, त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. यावेळी जो इंग्लंडचा दौरा आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्यामध्ये कालावधी असेल त्यामध्ये आयपीएलचे आयोजन करता येऊ शकते. जर यावर्षी आयपीएल झाले नाही तर बीसीसीआयला मोठा फटका बसू शकतो." त्यामुळे आता जर बीसीसीआयला आयपीएलचे उर्वरीत सामने खेळवायचे असतील तर त्यांच्यापुढे हा एकच पर्याय यावर्षी तरी दिसत आहे. त्यामुळे या पर्यायावर बीसीसीआय विचार करत आहे. कारण या कालावधीमध्ये खेळाडूंना कसं एकत्र आणायचं आणि त्यांना क्वारंटाइन केल्यावर कसे सामने आयोजित करायचे, याचा विचार आता बीसीसीआयला करावा लागणार आहे. त्याचबरोबर स्पर्धा जर भारताबाहेर खेळवायची असेल तर त्यांना काही रक्कम अन्य बोर्डालाही द्यावी लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला या सर्व गोष्टींचा विचार लवकररच करावा लागणार आहे. त्याचबरोबर भारतातील ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यशस्वी आयोजन कसे करता येईल, याचा विचारही बीसीसीआयला करावा लागणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात बीसीसीआयचे कोणती पावले उचलते, हे पाहणे सर्वांसाठीच महत्वाचे ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uoRrSx
No comments:
Post a Comment