Ads

Tuesday, May 4, 2021

IPL POSTPONED : ऑस्ट्रेलियाच्या आयपीएलमधील खेळाडूंची चिंता वाढली, जाणून घ्या मोठे कारण...

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चिंता आता वाढलेली आहे. कारण ऑस्ट्रेलयाचे खेळाडू लवकर मायदेशी परततील, अशी आशा बीसीसीआयला होती. पण ही गोष्ट सध्याच्या घडीला तरी होताना दिसत नाहीए. कारण याबाबतचे एक मोठे कारण आता पुढे आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी काही दिवसांपूर्वीच आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला होता. या तिन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने आपल्या देशात प्रवेश दिला आहे. पण त्यानंतर आता आयपीएल स्थगित झाल्यावर मात्र ऑस्ट्रेलियाने आयपीएलच्या खेळाडूंचा प्रवेश नाकारला आहे. १५ मेपर्यंत आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना तरी ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश मिळणार नाही. पण या नियमामध्ये शिथिलता आणावी, असे बीसीसीआयला वाटत होते. पण त्यामध्ये आता कोणतीही सकारात्मक घडामोड घडताना दिसत नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळानेही आता आपले हात वर केल्याचेच दिसत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चिंता आता आणखीनच वाढलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या नियमांमधून आम्ही खेळाडूंसाठी कोणतीही सुट मागणार नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चिंता वाढलेली असेल. कारण सध्याच्या घडीला तरी १५ मे पर्यंत भारतामध्ये जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तींना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. पण जर ही मुदत वाढवण्यात आली आणि क्रिकेट मंडळानेही यामध्ये कोणतीच भूमिका घेतली नाही तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे नेमके काय होणार, याची सर्वात जास्त चिंता आहे. कारण सध्याच्या घडीला तरी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना १२ दिवस तरी मालदिवमध्येच राहावे लागणार आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या सरकारने जर विमानबंदीची मुदत वाढवली तर काय करायचे, हा सर्वात मोठा प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपुढे असेल. आयपीएलमधील ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक सध्या मालदिवमध्ये आहेत. पण ऑस्ट्रेलियाच्या समालोचक मायकल स्लेटर यांनी ऑस्ट्रेलियाच्या सरकारवर कडक टीका केली होती. स्लेटरने ट्विटमध्ये म्हटले होते की, " आयपीएलसाठी जेव्हा मला भारतामध्ये जायचे होते, तेव्हा मला ऑस्ट्रेलियाच्या सरकारची परवानगी घ्यावी लागली होती. पण आता परतीचे मार्ग मात्र आमच्या सरकारने बंद केले आहेत. ही गोष्ट योग्य नाही. जर त्यांना आपल्या नागरिकांची काळजी असेल तर त्यांनी आम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये परतण्याची परवानगी द्यावी." त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे सरकार या आयपीएलमधील खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक यांना मायदेशात येण्याची परवानगी कधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tiXiYf

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...