नवी दिल्ली : आयपीएल स्थगित करण्यात आली असली तरी मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही बायो-बबलमधून बाहेर पडलेला पाहायला मिळत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे खेळाडू घरी कधी परतणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. याबाबतचे अपडेट्स आता समोर आले आहेत. आयपीएलच्या बायो-बबलमधून बाहेर पडण्यासाठी बीसीसीआयने काही नियम बनवले आहेत. या नियमांनुसारच प्रत्येक संघाला आपल्या खेळाडूंना घेऊन बाहेर पडता येणार आहे. त्यासाठी बीसीसीआय जेव्हा सांगेल तेव्हाच या संघांना आयपीएलच्या बायो-बबलमधून बाहेर पडता येणार आहे. त्यापूर्वी कोणताही संघ बायो-बबलमधून बाहेर पडू शकणार नाही. बीसीसीआयने यावेळी कोणते नियम बनवले आहेत, पाहा...आयपीएलच्या बायो-बबलमधून बाहेर पडण्यासाठी बीसीसीआयने काही नवीन नियम बनवले आहेत. त्यानुसार ज्या संघात कोणीही करोनाबाधित व्यक्ती नाही, त्यांना लवकर या बबलमधून बाहेर सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या संघात करोनाबाधित व्यक्ती आढळले होते त्यांना सता दिवस विलगीकरणामध्ये ठेवण्यात येईल आणि त्यांनतरच त्यांना आपल्या घरी जाता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक संघाला परदेशी खेळाडूंची वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे. कारण काही परदेशी खेळाडूंना अजूनपर्यंत त्यांच्या देशांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या परिस्थिती नेमके काय करायचे, हेदेखील बीसीसीआयने सांगितले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात एकही करोनाबाधित खेळाडू नव्हता. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडूंना उद्या (बुधवारपासून) आपल्या घरी पोहोचता येणार आहे. या सर्व खेळाडूंसाठी वेगळ्या विमानांची व्यवस्था संघाला करावी लागणार आहे. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंबाबतही त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्यांच्या देशाने प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना वगळता अन्य खेळाडूंना त्यांच्या देशात पाठवण्यात येणार असल्याचे समजते आहे. मुंबई इंडियन्सच्या ंसघातील ख्रिल लीन आणि नॅथन कल्टर नाइल या दोन ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची सर्वात जास्त समस्या आहे. कारण हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. त्यामुळे या दोन खेळाडूंबाबत मुंबई इंडियन्सचा संघ नेमका काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nO19LF
No comments:
Post a Comment