Ads

Tuesday, May 4, 2021

IPL POSTPONED : पुन्हा आयपीएल या वर्षात कधी होऊ शकते, जाणून घ्या मोठी बातमी...

नवी दिल्ली : करोनाच्या थैमानामुळे आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळवण्यात आले आहेत, पण आयपीएलमधील उर्वरीत सामने कधी खेळवण्यात येणार, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. पण आयपीएलचे उर्वरीत सामने काही महिन्यांमध्येच होऊ शकतात, असे वृत्त आता समोर येत आहे. सध्याच्या घडीला भारतात करोनाचे तांडव सुरु आहे. त्याचबरोबर भारतामध्ये करोनाची दुसरी लाट जुलै महिन्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे यावर्षी आयपीएल खेळवण्यात येणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पण आयपीएल या वर्षातच खेळवण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. बीसीसीआय सध्याच्या घडीला आयपीएल खेळवण्याची कोणतीही जोखीम उचलणार नाही. त्यामुळे येत्या १-२ महिन्यांत तरी आयपीएल होऊ शकणार नाही. त्याचबरोबर करोनाची दुसरी लाट जुलै महिन्यात आली तर तिला ओरसण्यासाठी दोन महिन्यांचा तरी कालावधी लागू शकतो. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्येही आयपीएल खेळवण्याची शक्यता आली. या दोन महिन्यांच्या परिस्थितीवर बीसीसीआय नजर ठेऊन असेल. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आयपीएमधील उर्वरीत सामने होऊ शकतात, असे वृत्त क्रिकबझ या वृत्तसंस्थेने दिले आहे. सप्टेंबर महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये क्रिकेट मालिका होणार आहे. त्याचबरोबर या काळात परदेशी संघ भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात परदेशी खेळाडूही भारतात असतील आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकाची पूर्व तयारी म्हणून आयपीएलचे सामने खेळवले जाऊ शकतात. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे सामने होऊ शकतात. पण हे आयपीएलचे सामने भारतात होणार की भारताबाहेर याबाबत मात्र कोणतीही स्पष्ट भूमिका अजून तरी पाहायला मिळालेली नाही. कारण जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, यानंतरच हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय काही महिने परिस्थिती पाहणार आहे आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घेणार आहे. पण आगामी चार महिन्यांमध्ये तरी आयपीएलचे सामने होऊ शकत नाहीत, असेच चित्र आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xEslRs

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...