Ads

Tuesday, May 4, 2021

IPLस्थगित: होमग्राउंडवर BCCIची बोल्ड; टी-२० वर्ल्डकपचे यजमानपद धोक्यात

नवी दिल्ली: भारतात या वर्षी आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे आयोजन होणार आहे. त्या आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला आयपीएल २०२१च्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला टी-२० वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन करू शकतो हे दाखवण्याची संधी होती. पण बायो बबलचा फुगा फुटला आणि बीसीसीआयची होमग्राउंडवर विकेट गेली. वाचा- भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरू होते. पण थेट बायो बबलमधील खेळाडूंना करोना झाल्याने बीसीसीआयला ही स्पर्धा स्थगित करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. या स्थगितीमुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. कारण यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या त्याचा परिणाम होऊ शकतो. आयपीएलचा बाबो बबल फुटल्याने आणि करोनाची तिसरी लाट नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता असल्याने ही स्पर्धा भारतात होण्याऐवजी युएईमध्ये होऊ शकते. वाचा- यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या काही महिन्यात घेतला जाऊ शकतो. आयपीएलच्या बायो बबलमधील खेळाडूंना करोना जाल्याने आता बीसीसीआयला देखील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये १६ संघांचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत थोडी शंका निर्माण झाली असेल. वाचा- वर्ल्डकप संदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी काही दिवासंपूर्वी केंद्र सरकारमधील काही निर्णय घेणाऱ्या व्यक्तीशी यासंदर्भात चर्चा केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. ही स्पर्धा युएईमध्ये घेण्यासंदर्भात फार सहमती झाली नाही. टी-२० वर्लकप देशातील ९ शहरांमध्ये घेण्याचा विचार करत आहे. पण या ठिकाणांची अद्याप निवड झालेली नाही. चारच आठवड्यात करण्याची वेळ आल्याने एक गोष्टी पक्की झाली आहे की भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी सुरक्षित असे वातावरण नाही. त्याच बरोबर भारतात नोव्हेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बीसीसीआय यजमानपद गमवण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा युएईमध्ये होण्याबाबत आयसीसी विचार करत असल्याचे वृत्त याआधी देखील आले होते. वाचा- ली या सर्व परिस्थीतीत बीसीसीआय देखील ही स्पर्धा युएईमध्ये होण्यास पाठिंबा देऊ शकतो. या स्पर्धेत सहभागी होणारे देश देखील त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करतील. वाचा- वर्ल्डकप युएईत खेळवण्याचे मुख्य कारण म्हणजे स्पर्धा फक्त तीन मैदानावर घेता येते. यासाठी हवाई प्रवासाची गरज नाही. या उलट भारतातील मैदानांची संख्या ९ वरून ५ जरी केली तर हवाई प्रवास करावा लागू शकतो. टी-२० वर्ल्डकप संदर्भात आयसीसी जून महिन्यात बैठक घेणार आहे. पण आयपीएलच्या स्थगितीमुळे भारताच्या हातातून वर्ल्डकपचे आयोजन दूर जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vzymgq

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...