अहमदाबाद: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आज ४ मे रोजी एक मोठा निर्णय घेतला. करोनामुळे बोर्डाने आयपीएलचा १४वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित केला. बाय बबलमध्ये असलेल्या खेळाडूंना एका पाठोपाठ एक करोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेतला गेला. वाचा- सोमवारी कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन खेळाडूंना आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना करोना झाल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे काल (३ मे) होणारी लढत देखील स्थगित करण्यात आली होती. आज सकाळी सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू वृद्धीमान सहा याला देखील करोना झाला. तर दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा याची टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली. या सर्व घडामोडींच्या पाश्वभूमीवर आणि गव्हर्निंक काउंसिलची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यावर सहमीत झाली. वाचा- बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ तसेच या स्पर्धेशी संबंधित सर्व लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या लोकांच्या सुरक्षेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. सर्वांची सुरक्षा, आरोग्य याचा विचार करून स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. हा सर्वात कठीण काळ आहे, विशेषत: भारतासाठी आम्ही लोकांच्यात काही सकारात्मकता आणि उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण आता ही स्पर्धा स्थगित करत आहोत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना घरी पाठवण्यात येईल. ते आपल्या कुटुंबाच्या आणि प्रिय व्यक्तींच्या जवळ जाऊ शकतील. जेणेकरून या कठीण काळात ते कुटुंबासोबत राहतील. जितके खेळाडू आणि स्टाफ बायो बबलमध्ये आहे त्यांची करोना चाचणी केली जाईल. आणि रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतरच घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतर घरी सुरक्षितपणे आणि कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचण्याची खबरदारी बीसीसीआयची असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xIT3sj
No comments:
Post a Comment