नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या सरकारने आयपीएलमधील () त्यांच्या खेळाडूंना नाकारले आहे. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचण्यासाठी तब्बल १५ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण तरीही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी () आज आली आहे. आयपीएलमधील ऑस्ट्रेलियाच्या माइक हसी या एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे, पण अन्य व्यक्ती मात्र सुरक्षित आहेत. त्यामुळे हसी वगळता अन्य ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच यांना सुरक्षितपणे रवाना करण्यात आले आहे. हे ऑस्ट्रेलियाचे सर्व सदस्य मालदिवला जाणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने परवानगी दिल्यावरच त्यांना मायदेशी पोहोचता येणार आहे. पण यामधील पहिली सकारात्मक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामधील सर्व व्यक्ती सुरक्षितपणे भारतामधून रवाना झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघटनेने यावेळी सांगितले की, " ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच, सामनाधिकारी आणि समालोचक सुरक्षितपणा भारताबाहेर निघाले आहेत आणि ते आता मालदिवमध्ये राहणार आहेत. जोपर्यंत ऑस्ट्रेलियाचे सरकार त्यांना मायदेशात येण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत त्यांना तिथेच राहावे लागणार आहे." पण मालदिवमध्ये पोहोचल्यावरही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चिंता संपणार नाही. सध्याच्या घडीला तरी १५ मे पर्यंत भारतामध्ये जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तींना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. पण जर ही मुदत वाढवण्यात आली आणि क्रिकेट मंडळानेही यामध्ये कोणतीच भूमिका घेतली नाही तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे नेमके काय होणार, याची सर्वात जास्त चिंता आहे. कारण सध्याच्या घडीला तरी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना १२ दिवस तरी मालदिवमध्येच राहावे लागणार आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या सरकारने जर विमानबंदीची मुदत वाढवली तर काय करायचे, हा सर्वात मोठा प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपुढे असेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे नेमके काय होणार, याची पूर्ण जबाबदारी आता बीसीसीआयने घेतलेली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे नेमके काय होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. त्यासाठी आता १५मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या सरकारने ही विमानबंदी आणखीन वाढवली तर खेळाडूंसाठी ती डोकेदुखी ठरू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ekNZTk
No comments:
Post a Comment