Ads

Friday, May 7, 2021

IPL 2021 : आयपीएल सोडून घरी परतल्यावर युवा खेळाडूच्या वडिलांना झाला करोना, भावाने केली होती आत्महत्या....

नवी दिल्ली : आयपीएल स्थगित झाल्यावर भारताचा युवा खेळाडू चेतन साकरिया हा आपल्या घरी पोहोचला. पण घरी पोहोचल्यावर चेतनला एक वाईट बातमी मिळाली. चेतनच्या वडिलांना करोनाची बाधा झाली आहे. काही दिवसांपूर्वी चेतनच्या भावाने आत्महत्या केली होती. सध्याच्या घडीला घरात कामावणारा चेतन हा एकमेव व्यक्ती आहे. आयपीएलमधून जे पैसे मिळाले ते आता आपल्या वडिलांच्या उपचारासाठी तो खर्च करत आहे. चेतनचे वडिल कांजीभाई यांना करोनाची बाधा झाली आहे. त्याचबरोबर कांजीभाई यांना मधुमेह आहे, त्यामुळे चेतनची चिंता आणखीन वाढलेली आहे. चेतनचे वडिल हे टेम्पो चालवून घर चालवत होते. चेतन हा एक गरिब कुटुंबातून आला आहे. आता त्याचे बाबा काम करत नसल्याचे घरची सर्व जबाबदारी चेतनवरच आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले होते. आयपीएलमध्ये चेतनने चमकदार कामगिरी केली होती. आयपीएलचे काही सामने झाल्यावर चेतनला काही प्रमाणात मानधन मिळाले होते. हे मानधन चेतनने आपल्या घरी वडिलांच्या उपचारासाठी ट्रान्सफर केले होते. आयपीएल स्थगित झाल्यावर चेतन आपल्या घरी पोहोचला खरा. पण त्यानंतर लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागले. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत तो हॉस्पिटलमध्येच बसून होता. आपल्या बाबांची तब्येत लवकर सुधारावी, यासाठी चेतन प्रयत्न करत आहे. पण त्यांना मधुमेह असल्यामुळे थोडे चिंतेचे वातावरण आहे. आयपीएलपूर्वी चेतन हा बीसीसीआयने आयोजित केलेली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होता. त्यावेळी त्याच्या लहान भावाने आत्महत्या केली होती. पण चेतन स्पर्धा खेळत असल्यामुळे त्याला कुटुंबियांनी ही गोष्ट सांगितली नव्हती. ही दुर्देवी घटना कळल्यावर चेतनने आपल्या भावासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही लिहिली होती. चेतन म्हणाला की, " आयपीएलचे काही सामने झाले, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण हे सामने झाल्यामुळेच मला काही प्रमाणात मानधन मिळाले होते. हे मानधन मी त्वरीत घरच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले होते. वडिलांच्या उपचारासाठी या पैशांचा उपयोग झाला."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nW8xED

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...