Ads

Friday, May 7, 2021

धक्कादायक... करोना झालेल्या भारताच्या ३६ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक गोष्ट आता समोर आली आहे. कारण भारताच्या ३६ वर्षीय क्रिकेटपटूचे करोनाने निधन झाल्याची गोष्ट आता समोर आली आहे. या क्रिकेटच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. राजस्थानसाठी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विवेक यादवने संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. संघातील एक उपयुक्त लेग स्पिनर अशी विवेकची ओळख होती. विवेकला कर्करोग झाला होता. त्यामुळे जयपूर येथील हॉस्पिटलमध्ये तो केमोथेरिपी घेण्यासाठी गेला होता. त्याचवेळी विवेकची करोना चाचणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. विवेकचे बुधवारी निधन झाले. विवेकच्या निधनानंतर राजस्थानच्या आजी-माजी खेळाडूंनी हळहळ व्यक्त केली आहे. आकाश चोप्राने दिली माहिती... भारताचा माजी सलामीवीर आणि समाचोलक आकाश चोप्राने याबाबतची माहिती दिली. आकाशने याबाबत एक ट्विट केले होता. या ट्विटच्या माध्यमातून आकाशने विवेकच्या निधनाची बातमी दिली होती. आकाशने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " राजस्थानचा रणजी क्रिकेटपटू आणि जवळचा मित्र असलेला विवेक यादव या जगात राहिलेला नाही, त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. माझ्या संवेदना त्याच्या कुटुंबियांबरोबर आहेत." विवेकचे अशी होती रणजी कारकिर्दविवेक यादव हा राजस्थानचा एक लेग स्पिनर गोलंदाज होता. विवेकने १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५७ विकेट्स मिळवले होते. राजस्थानचा संघ २०१०-११ साली रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. या राजस्थानच्या संघात विवेकचाही समावेश होता. विवेकचा हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना होता. या सामन्यासाठी विवेकने चांगली तयारीही केली होती. विवेकने आपला अखेरचा सामना ३० वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच खेळला होता. त्यानंतर तो राजस्थानच्या संघाकडून एकही सामना खेळला नव्हता. विवेकची बुधवारी प्राणज्योत मालवली. त्यामुळे राजस्थानचा एक चांगला खेळाडू या जगात राहिलेला नाही, अशी भावना त्याच्या संघातील सहकाऱ्यांनी व्यक्त केली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3b9bX1G

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...