नवी दिल्ली: आयपीएलच्या जैव सुरक्षित वातावरणात काही खेळाडूंना करोना व्हायरसची लागण झाल्याने बीसीसीआयने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. बीसीसीआयकडून अद्याप कधी सुरू आयोजित केली जाणार याबाबदल काही सांगण्यात आलेले नाही. आयपईएल २०२१ मध्ये २९ लढती झाल्या असून अजून ३१ लढती व्हायच्या आहेत. वाचा- आयपीएलमधील उर्वरीत लढतीबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असताना या स्पर्धेतील एका संघ मालकाने या स्पर्धेच्या भवितव्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. वाचा- होणार चॅम्पियन राजस्थान रॉयल्सचे मालक यांनी आयपीएल पुन्हा एकदा आयोजित करणे आव्हानात्मक असेल. या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या आधी किंवा नंतर आयपीएल आयोजित करण्याची पुसटशी शक्यता आहे. माध्यमांशी बोलताना बादले म्हणाले, मला वाटते की सर्वात मोठे आव्हान यासाठी योग्य वेळ शोधण्याचा आहे. खेळाडू अधिक खुप क्रिकेट खेळत आहेत. वाचा- ... करोनामुळे या वर्षी कार्यक्रम खुप व्यस्त आहे. जगभरातील सर्व क्रिकेट बोर्ड अधिक अधिक स्पर्धा आणि कसोटी सामन्याचे आयोजन करण्याचा विचार करत आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर एशले जाइल्स यांनी आधीच स्पष्ट केले आहे की स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यास इंग्लंडचे आघाडीचे खेळाडू यात सहभाग होणार नाहीत. कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये त्यांचा संघ बांगलादेश आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहे. इतक नाही तर टी-२० वर्ल्डकपनंतर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. आयपीएलमधील शिल्लक सामने इंग्लंड किंवा मध्य पूर्व आशियात आयोजित करण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. पण एकूणच स्पर्धा पुन्हा आयोजित करणे आव्हानात्मक असल्येच बादले यांनी सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3y9i93M
No comments:
Post a Comment