Ads

Tuesday, May 11, 2021

IPL 2021 : आयपीएलला मोठा धक्का, या देशाचे खेळाडू आता स्पर्धा खेळणार नाहीत

नवी दिल्ली : आयपीएलला आता मोठा धक्का बसला आहे. करोनामुळे आयपीएल स्थगित करावे लागल्यानंतर आता परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास तयार नसल्याचेच सध्या दिसत आहे. एका देशाने तर आता आमचे खेळाडू उर्वरीत आयपीएलच्या सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले आहे. इंग्लंडचे खेळाडू आता उर्वरीत आयपीएलचे सामने खेळू शकणार नसल्याचे आता त्यांच्या क्रिकेट मंडळातील काही व्यक्तींनी सांगितले आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाचे डायरेक्टर असलेले माजी खेळाडू अॅश्ले जाइल्स यांनी याबाबतेचे मोठे विधान केले आहे. जाइल्स यांनी सांगितले की, " आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आम्ही इंग्लंडच्या खेळाडूंना एका स्पर्धेमधून सुटही दिली होती. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना आम्ही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत न खेळण्याची मुभा दिली होती. पण आता यापुढे आयपीएलचे सामने आणि देशाचे सामने हे एकाचवेळी होऊ शकतात, असे दिसत आहे. आयपीएलचे सामने आता सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे. या दोन्ही महिन्यात इंग्लंडच्या काही स्पर्धा आहेत. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाबरोबर व्यस्त असतील." करोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर इंग्लंडच्या सर्व खेळाडूंना मायदेशी सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांना आता क्वारंटाइन करण्यात आले असून ते काही दिवसांमध्ये सरावही सुरु करणार आहेत. पण यावर्षी मात्र ते आयपीएलचे सामने खेळू शकणार नाहीत, असेच दिसत आहे. कारण इंग्लंडच्या संघाचे काही सामने यापुढे सुरु राहणार आहेत. त्यामुळे त्यांना आयपीएलचे सामने खेळता येणार नाहीत, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आयपीएलसाठी हा एक मोठे धक्का असून शकतो. इंग्लंडकडून बरेच खेळाडू आयपीएलमध्ये यावर्षी खेळत होते. यामध्ये बेन स्टोक्स, जोस बटलर, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जॉनी बेअरस्टोसारख्या खेळाडूंचा समावेश होता. पण आता या खेळाडूंना आगामी आयपीएलचे सामने खेळता येणार नाहीत, असेच दिसत आहे. त्यामुळे आयपीएलसाठी हा एक मोठा धक्का मसजला जात आहे. यावर आता बीसीसीआय काय भूमिका मांडते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33xciXI

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...