नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे क्रिकेटच्या वेळापत्रकात मोठे बदल झाले आहेत. या निमित्ताने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने हुशारी दाखवली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली त्याच बरोबर आणखी एका चर्चेला सुरूवात झाली. वाचा- ... जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. याच काळात भारताचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारताचा दुसरा संघ जाणार आहे. या संघात वनडे आणि टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असले. अर्थात या संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आदी स्टार खेळाडू असणार नाहीत. वाचा- भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात प्रत्येकी ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. भारताच्या या संघासोबत जसे स्टार खेळाडू असणार नाहीत तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड देखील असणार नाही. हे सर्व जण इंग्लंडमध्ये कसोटी संघासोबत असतील. वाचा- यामुळेच श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचे नाव समोर आले आहे. राहुलसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादामीचे काही जण असण्याची शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्यात या खेळाडूंना मिळू शकते संधी शिखर धवन, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, पृथ्वी शॉ, दीपक चहर, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि राहुल तेवतिया वाचा- असे आहे संभाव्य वेळापत्रक इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या रिपोर्टनुसार या दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. पहिली वनडे १३ जुलै, दुसरी १६ तर तिसरी आणि अखेरची १९ जुलै रोजी होणार आहे. २२ जुलै पासून टी-२० मालिका होणार असून २४ ला दुसरी तर २७ जुलै रोजी तिसरी आणि अखेरची टी-२० लढत होईल. अर्थात या संदर्भात बीसीसीआयने अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ ५ जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होणार आणि मालिका संपल्यानंतर २८ जुलै रोजी भारतात परत येईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uJbhbm
No comments:
Post a Comment