Ads

Tuesday, May 4, 2021

IPL 2021 POSTPONED : ऑस्ट्रेलियाने आयपीएलमधील खेळाडूंना प्रवेश नाकारला, या देशाचा घेणार आसरा

नवी दिल्ली : करोनाच्या संकटामुळे आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची सर्वात मोठी अडचण झाली आहे. कारण ऑस्ट्रेलियाने आता भारतामधून येणाऱ्या लोकांना आपल्या देशात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंनी आता एका देशाचा आसरा घेतला असल्याचे समजते आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने १५ मे पर्यंत भारतामधील कोणत्याही विमानांना किंवा प्रवाशांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तर आयपीएल पुढे ढकलण्यात आले आहे आणि काही दिवस सामने होणार नाहीत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण त्यांना आता त्यांच्या देशात जाता येणार नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एका छोट्या देशाचा आसरा घेण्याचे ठरवले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलचा समालोचक मायकल स्लेटर हा स्पर्धेतून काही दिवसांपूर्वीच बाहेर पडला होता तो आता स्पर्धेचे समालोचन करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. त्याचबरोबर स्लेटरने आता भारत सोडले असून त्याने आता मालदिवमध्ये राहायचे काही काळ ठरवले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदिव या देशामध्ये काही काळ आसरा घेणार असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जोपर्यंत ऑस्ट्रेलिया भारतामधील विमानांना परवानगी देत नाही, तोपर्यंत हे सर्व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि प्रशिक्षक मालदिवमध्येच राहणार आहेत. मायकल स्लेटरने याबाबत एक ट्विटही केले होते. आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " आयपीएलसाठी जेव्हा मला भारतामध्ये जायचे होते, तेव्हा मला ऑस्ट्रेलियाच्या सरकारची परवानगी घ्यावी लागली होती. पण आता परतीचे मार्ग मात्र आमच्या सरकारने बंद केले आहेत. ही गोष्ट योग्य नाही. जर त्यांना आपल्या नागरिकांची काळजी असेल तर त्यांनी आम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये परतण्याची परवानगी द्यावी." त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे सरकार या आयपीएलमधील खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक यांना मायदेशात येण्याची परवानगी कधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण आता किती काळ त्यांना मालदिवमध्ये राहता येइल, याबाबत स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33br3Q7

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...