Ads

Tuesday, May 11, 2021

IND vs SL : भारताच्या श्रीलंकेदौऱ्याबाबत चाहत्यांसाठी आली ही वाईट बातमी, जाणून घ्या...

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय मालिका खेळवण्याचे ठरवण्यात आले आहे. पण या दौऱ्याबाबत चाहत्यांसाठी मात्र एक वाईट बातमी आली आहे. श्रीलंकेमध्ये क्रिकेट खेळवण्यात यावे, यासाठी त्यांचे क्रिकेट मंडळ प्रयत्नशील आहे. गेल्यावर्षीच भारताचा श्रीलंकेमध्ये दौरा होता, पण तो करोनामुळे रद्द करण्यात आला होता. पण आता यावर्षी हा दौरा नियोजित वेळेमध्ये व्हावा, यासाठी श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ तयारी करत आहे. पण यामध्ये चाहत्यांसाठी मात्र चांगली बातमी आलेली नाही. भारताच्या श्रीलंकेच्या दौऱ्यात जे सामने होणार आहे, त्या सामन्यांमध्ये एकाही चाहत्याला प्रवेश देण्यात येणार नाही. या सहाही सामन्यांमध्ये एकाही चाहत्याला सामना पाहता येणार नाही. हे सर्व सामने एकाच मैदानात खेळवण्याचा श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाचा मानस आहे. करोनाचा कोणताही विपरीत परीणाम या सामन्यांवर होऊ नये, यासाठी काही कठोर पावले यावेळी श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला उचलावी लागत आहेत. श्रीलंकेच्या क्रिकेट मंजळाच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू अर्जुन डीसिल्व्हा यांनी यावेळी सांगितले की, " जुलै महिन्यात परिस्थिती नेमकी कशी आहे, यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. पण करोनाच्या काळात आम्ही कोणत्याही चाहत्याला मैदानात प्रवेश देणार नाही. यावेळी सर्व सामने हे चाहत्यांविनाच खेळवण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी करोनामुळेच भारताचा दौरा रद्द करण्यात आला होता. यावेळी आम्हीला कोणतीही जोखीम उचलायची नाही. त्यामुळे आम्हाला काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत." डीसिल्व्हा यांनी पुढे सांगितले की, " भारत आणि श्रीलंकेचे सर्व सामने हे कोलंबोमधील प्रेमदासा स्डेडियममध्ये खेळवण्यात येतील. करोनाच्या काळात एकाच ठिकाणी सामने खेळवले, हे आम्हाला योग्य वाटत आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सर्व सामने एकाच मैदानात खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे." त्यामुळे आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील प्रेमदासा या स्टेडियममध्ये होणाऱ्या कोणत्याही सामन्याला प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33AnKlu

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...