Ads

Tuesday, May 11, 2021

बीसीसीआयचा खेळाडूंसाठी मोठा निर्णय, दौऱ्यावर जायचे असेल तर ही गोष्ट करावीच लागेल...

नवी दिल्ली : भारताच्या कोणत्याही खेळाडूला जर आता परदेशी दौऱ्यावर जायचे असेल तर त्याच्यासाठी आता एक मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या परदेशी दौऱ्यावर जाताना भारतीय खेळाडूंना ही गोष्ट करणे गरजेचे आहे. जर कोणत्याही खेळाडूने ही गोष्ट केली नाही तर त्याच्याबाबत बीसीसीआयला योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्याच्या घडीला करोनाचे वातावरण आहे. भारताची अवस्था चिंताजनक आहे. त्याचबरोबर काही देशांनी भारतावर विमानबंदी आणलेली आहे. त्यामुळे भारतामधून कोणतीही व्यक्ती आता काही देशांमध्ये जाऊ शकत नाही. त्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंबाबत आता मोठा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या खेळाडूंना फक्त कोविशील्ड या लसीचा डोस घेण्यास सांगितले आहे. भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी करोवनावरील लसीचा एक डोस घ्यावा, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर खेळाडूंनी दुसरा डोस कधी घ्यायचा, याचा विचारही बीसीसीआय करत आहे. भारतीय खेळाडूंना दुसरा डोस देण्यासाठी बीसीसीआय सध्याच्या घडीला इंग्लंडबरोबर संपर्क साधत असल्याचे समजत आहे. इंग्लंडमध्ये गेल्यावर या खेळाडूंना दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे करोना चाचणी, क्वारंटाइन याबरोबरच खेळाडूंना आता इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी करोनाची लसही घ्यावी लागणार आहे. बीसीसीआयने खेळाडूंना महत्वाच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार खेळाडूंना मुंबईमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची करोनाची चाचणी होणार आहे. या करोनाच्या चाचणीमध्ये जर कोणीही पॉझिटीव्ह सापडले तर त्यांच्यासाठी वेगळ्या खासगी विमानाची सोय यावेळी करण्यात येणार नाही. ज्या खेळाडूंना इंग्लंडला जायचे आहे, त्यांना मुंबईमध्ये येण्यापूर्वीही आपले करोना चाचणीचे अहवाल दाखवावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना इंग्लंडच्या दौऱ्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्लंडला जाणाऱ्या भारताच्या कोणत्याही खेळाडूला किंवा क्रिकेट मंडळाला कोणतीही समस्या येऊ नये, याची काळजी आता बीसीसीआय घेताना दिसत आहे. त्यामुळे काही निर्णय बीसीसीआयला यावेळी घ्यावे लागले आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hoxiIF

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...