नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना संघाच्या प्रशिक्षकांनी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये प्रशिक्षकांनी काही गंभीर आरोप केले आहेत. भारतीय संघामध्ये जी स्टार संस्कृती उदयाला आली आहे, त्याबद्दल प्रशिक्षकांनी आपले मत या पत्रामध्ये मांडले आहे. भारताच्या महिला संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यू व्ही रमण यांनी गांगुली आणि द्रविड यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये रमण यांनी कोणत्याही खेळाडूचे नाव घेतलेले नाही. पण संघांमध्ये जी काही स्टार संस्कृती सुरु आहे ती घातक आहे. यामुळेच संघाचे मोठे नुकसान होत आहे. काही खेळाडू संघापेक्षा स्वत:ला मोठे समजत आहेत. त्यामुळे संघातील वातावरण दुषित होत आहे. त्यामुळे यावर काही तरी उपाय योजना करावी, असे रमण यांनी म्हटले आहे. रमण यांच्या पत्राबद्दल सूत्रांनी सांगितले की, " मला माहिती असलेल्या माहितीनुसार रमण हे नेहमीच आपल्या संघाचा प्रथम विचार करत आहेत. रमण यांचा संघातील खेळाडूंवरही विश्वास होता. पण त्याचबरोबर कोणत्याही खेळाडूने संघापेक्षा मोठे समजू नये, असेही त्यांचे म्हणणे होते." रमण हे प्रशिक्षक असताना भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण भारतीय संघाला यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याचबरोबर रमण यांनी संघात काही बदलही केले होते. पण त्यानंतर त्यांना प्रशिक्षकपदावर कायम ठेवण्यात आले नाही. आता महिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी रमेश पोवार यांची निवड करण्यात आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने हा निर्णय घेतला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hrKjRM
No comments:
Post a Comment