Ads

Friday, May 14, 2021

पृथ्वी शॉबाबत मोठे वक्तव्य, निवड समिती सदस्याने सांगितली ही महत्वाची गोष्ट...

नवी दिल्ली : भारताचा युवा धडाकेबाज खेळाडू पृथ्वी शॉ बाबत आता एक मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. निवड समितीमधील माजी सदस्याने पृथ्वीबात काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्याला संघात का स्थान दिले नाही, याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. निवड समितीमधील माजी सदस्य शरणदीप सिंग यांनी सांगितले की, " भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागकडे जी क्षमता होती ती मला पृथ्वीमध्ये दिसते आहे. पृथ्वी सारख्या खेळाडूला एवढ्या लवकर तुम्ही दूरकरून शकत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नव्हती. पण त्यानंतर त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याचबरोबर फलंदाजीमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्यावर त्याने काम केले आहे आणि या त्रुटी त्याने दूर केल्या आहेत. आयपीएलमध्येही त्याच्याकडून दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पृथ्वी आणि शुभमन गिलसारख्या युवा खेळाडूंना तुम्ही पाठिंबा द्यायला हवा." ऑस्ट्रेलियातील एका कसोटी सामन्यात पृथ्वी अपयशी ठरला आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी देण्यात आली नव्हती. पण त्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली केली होती. आठ सामन्यांमध्ये त्याने ८०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर आयपीएलमध्येही त्याने धमाकेदार फलंदाजी केली होती. पण त्यानंतरही त्याची निवड इंग्लंडच्या दौऱ्यासाठी करण्यात आली नाही. शरणदीप यांनी भारतीय संघातील निवडवरही काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शरणदीप म्हणाले की, " इंग्लंडच्या दौऱ्यासाठी राखीव खेळाडू म्हणून अभिमन्यू मिथून, अव्हेश खान, प्रसिध कृष्णा आणि अर्जन नागवासवाला यांची निवड केली आहे. पण भारतीय अ संघातून न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या प्रियांक पांचाळची मात्र यावेळी निवड करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर देवदत्त पडीक्कलनेही चांगल्या धावा केल्या होत्या, पण त्याचीही निवड करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटकडेही निवड समितीकडून लक्ष दिले जात नाही."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3y4Yp14

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...