Ads

Saturday, May 8, 2021

पृथ्वी शॉ याला धावा करूनही भारतीय संघात का मिळाले नाही स्थान, जाणून घ्या मोठं कारण...

नवी दिल्ली : आयपीएल असो किंवा विजय हजारे ट्रॉफी पृथ्वी शॉ याने धडाकेबाज फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळेच पृथ्वीला भारतीय संघात स्थान मिळेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण धावा करूनही पृथ्वीला भारतीय संघात का स्थान मिळाले नाही, यामागचे मोठे कारण आता समोर आले आहे. पृथ्वीने भारतीय संघात दमदार पदार्पण केले होते. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात तो अपयशी ठरला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या बीसीसीआयच्या विजय हझारे ट्रॉफीतील आठ सामन्यांमध्ये पृथ्वीने ८०पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याचबरोबर आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याने मैदान गाजवले होते. केकेआरविरुद्धच्या सामन्यात तर पहिल्याच षटकात त्याने सहा चौकार वसूल करत विक्रम रचला होता. पण तरीही त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली नाही. पृथ्वीच्या बाबतीत एक अहवाल आता पुढे आला आहे. या अहवालानुसार पृथ्वीला यावेळी वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वजन कमी झाल्यावरच त्याचा विचार भारतीय संघासाठी करण्यात येऊ शकतो, असे त्याला म्हटले गेले आहे. जर पृथ्वीला भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला आपेले वजन कमी करावे लागेल, असे स्पष्टपणे बीसीसीआय ने त्याला सांगितले आहे. पृथ्वी हा २१ वर्षांचा आहे. पण मैदानामध्ये त्याच्या हालचाली फार संथगतीने होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच त्याला वजन कमी करण्याचा सल्ला बीसीसीआयने दिला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पृथ्वी जेव्हा भारतीय संघाकडून खेळत होता, तेव्हाही त्याच्याकडून काही चुका झाल्या होत्या. क्षेत्ररक्षणावर त्याला लक्ष केंद्रीत करता आले नव्हते. त्यामुळेच आता पृथ्वीला वजन कमी करून अधिक फिट होण्याचा सल्ला बीसीसीआयने दिल्याचे समजते आहे. काही महिन्यांपूर्वी रिषभ पंतच्या बाबतही असेच म्हटले गेले होते. पण त्यानंतर रिषभने यावर मदत घेतली आणि भारतीय संघात पुनरागमन करण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता पृथ्वी वजन कमी करून जास्तीत जास्त फिट होतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o6DjuQ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...