Ads

Saturday, May 8, 2021

IPL 2021 : न्यूझीलंडमध्ये न जाताच आयपीएलचे खेळाडू पोहोचले दुसऱ्याच देशात, पाहा नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली : आयपीएलमधील न्यूझीलंडच्या खेळाडूंना आता अचानकपणे विचित्र निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण भारतमधून न्यूझीलंडमध्ये न जाता त्यांनी दुसऱ्याच देशाचा आसरा घेतला असल्याचे आता पाहायला मिळाले आहे. आयपीएल सुरु असताना न्यूझीलंडचे खेळाडू भारतामधूनच इंग्लंडमध्ये जाणार होते. कारण इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. त्यासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी हा निर्णय घेतला होता. पण आयपीएल स्थगित केल्यावर मात्र न्यूझीलंडचे खेळाडू आपल्या मायदेशी जाणार होते. पण मायदेशी न जाता त्यांनी दुसऱ्याच देशाचा आसरा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्याच्या घडीला भारत सोडून न्यूझीलंडचे खेळाडू हे मालदिव येथे गेले आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक, समालोचक, पंच आणि सामनाधिकारी यांनी मालदिवचा आसरा घेतला होता. आता न्यूझीलंडचे खेळाडूही मालदिवमध्ये राहण्यासाठी गेले असल्याचे समजते आहे. आयीपएलमधील न्यूझीलंडच्या खेळाडूंना दिल्लीमध्ये राहणे सुरक्षित वाटत नव्हते, त्यामुळे त्यांनी लगेचच हा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट मंडळानेही खेळाडू मालदिवला गेल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे आता हे खेळाडू मालदिवमधून न्यूझीलंडमध्ये कधी जाणार, हे पाहावे लागेल. क्रिकबझसह काही संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या खेळाडूंना दिल्लीमध्ये असुरक्षित वाटत होते. त्यामुळे त्यांनी लगेचच भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील बायो बबलमध्ये समस्या जाणवली होती. दिल्लीच्या मैदानातील कर्मचारीही करोना पॉझिटीव्ह सापडले होते. त्यामुळे दिल्लीतील वातावरण योग्य नसल्याचे न्यूझीलंडच्या खेळाडूंना वाटत होते. न्यूझीलंडचे खेळाडू काही तासांनी आपल्या देशासाठी रवाना होणार असल्याचे समजत होते. पण न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अचानकपणे भारतामधून लगेच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे खेळाडू आता मालदिवला पोहोचले आहेत. त्यानंतर ते आपल्या देशात रवाना होणार आहेत. त्यामुळे भारत सध्याच्या घडीला असुरक्षित असल्याचे परदेशी खेळाडूंचे म्हणणे आहे. त्यामुळे यापुढे आयपीएल आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवणे, हे बीसीसीआयसाठी कठीण जाऊ शकते. त्यामुळे आता बीसीसीआय कोणते पाऊल उचलते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bbf8pU

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...