मुंबई: देशात करोनाची दुसरी लाट आली असून रोज काही लाखात रुग्ण आढळत आहेत. मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. महाराष्ट्रात देखील करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत हे प्रमाण अधिक आहे, त्यामुळेच राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केलीय. राज्यातील नागरिकांना मुक्तपणे बाहेर फिरता येत नाही. अतिशय आवश्यक आणि गरजेच्या कामासाठी परवानगी घेतल्यानंतरच नागरिकांना बाहेर प्रवास करण्याची मुभा आहे. वाचा- भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉला मात्र राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची जाणीव नसावी. यामुळेच कोणतीही परवानगी आणि नियमांचे पालन न करता फिरणाऱ्या पृथ्वी शॉला पोलिसांनी अडवले. वाचा- करोनामुळे आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्यात आलाय. स्पर्धेतील फक्त २९ लढती झाल्या आहेत. यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना मोठा वेळ उपलब्ध झालाय. इतक नव्हे तर पृथ्वी शॉची पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली नाही. त्यामुळी पृथ्वीकडे बराच मोकळा वेळ आहे. या मोकळ्या वेळी पृथ्वीने फिरायला जाण्याचा बेत केला. वाचा- करोनामुळे नियमीत विमान सेवा बंद आहे. यामुळेच पृथ्वी शॉने गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर-कोकण असा मार्ग निवडला. गाडीतून निघालेल्या पृथ्वीच्या सहलीला मोठा सेटबॅक बसला जेव्हा अंबोली पोलिसांनी त्याला अडवले आणि इ-पासची विचारणा केली. राज्य सरकारच्या नियमानुसार राज्यातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीकडे इ-पास गरजेचा आहे. वाचा- पृथ्वी शॉकडे इ-पास नव्हता. पोलिसांनी इ-पास असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही असे त्याला सांगितले. यावर त्याने पोलिसांना गोव्यात जाण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. पण पोलिसांनी नकार दिला. गोव्यात जाण्याच्या तयारीने बाहेर पडलेल्या पृथ्वीने फोनवरून इ-पाससाठी अर्ज केला. त्यानंतर काही तासांनी जेव्हा पृथ्वीला पास मिळाला तेव्हा कुठे पोलिसांनी त्याला गोव्याला जाण्याची परवानगी दिली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uM5Eco
No comments:
Post a Comment