Ads

Tuesday, May 11, 2021

आता रिस्क नको; एकाच मैदानावर होणार भारताची संपूर्ण मालिका

नवी दिल्ली: भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काल सोमवारी माहिती दिली होती. या दौऱ्याचा संभाव्य कार्यक्रम देखील प्रसिद्ध झाला आहे. वाचा- भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ३ सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा हा दुसरा संघ असेल. पहिला संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असेल तर दुसरा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असेल. वाचा- ... या दौऱ्यातील सर्व लढती एकाच मैदानावर होण्याची शक्यता आहे. राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर दौऱ्यातील वनडे आणि टी-२० मालिकेतील सामने होतील. वाचा- श्रीलंका क्रिकेटच्या प्रसाशकीय समितीचे चेअरमन अर्जुन डी सिल्वा यांनी सांगितले की, पूर्ण मालिका एकाच मैदानावर घेण्याची आमची योजना आहे. सध्या तरी आम्ही आर प्रेमदासा स्टेडियमवर हे सामने खेळवण्याचा विचार करत आहोत. वाचा- या दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. पहिली वनडे १३ जुलै, दुसरी १६ तर तिसरी आणि अखेरची १९ जुलै रोजी होणार आहे. २२ जुलै पासून टी-२० मालिका होणार असून २४ ला दुसरी तर २७ जुलै रोजी तिसरी आणि अखेरची टी-२० लढत होईल. अर्थात या संदर्भात बीसीसीआयने अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. वाचा- ... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ ५ जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होणार आणि मालिका संपल्यानंतर २८ जुलै रोजी भारतात परत येईल. श्रीलंकेत पोहोचल्यानंतर भारतीय संघाला एक आठवड्याचे क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागले. हे सात दिवस दोन भागात विभागला जाणार आहेत. पहिले तीन दिवस सख्त क्वारंटाइन असेल. ज्यात एका रुममध्ये प्रत्येक खेळाडूला रहावे लागले. अखेरच्या चार दिवसात खेळाडू एकमेकांना भेटून सराव करू शकतील. सध्या करोना व्हायरसची संख्या वाढत चालल्याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील लढती प्रेक्षकांशिवाय होतील. २०१८ साली निदहास ट्रॉफीनंतर भारतीय संघाचा हा पहिला श्रीलंका दौरा आहे. इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध खेळणार आहे. तेव्हा श्रीलंकेच्या संघ भारतात येणार आहे. श्रीलंका दौऱ्यात विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, केएल राहुल आदी दिग्गज खेळाडू असणार नाहीत. यासाठी नव्या खेळाडूंची निवड केली जाणार आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच भारत अ साठी शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळू शकते. लंका दौऱ्यात या खेळाडूंना मिळेल संधी शिखर धवन, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, पृथ्वी शॉ, दीपक चहर, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि राहुल तेवतिया


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uHo5Ph

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...