नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंसाठी आता बीसीसीआयने कडक नियम बनवले आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर खेळाडूंच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसू शकतो. त्याचबरोबर खेळाडू जर करोना पॉझिटीव्ह सापडला, तर त्याच्याबाबतही कडक निर्णय घेतला जाणार असल्याचे आता बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडमध्ये विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्यासाठी जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने आपल्या भारतीय संघाची निवडही केली आहे. पण या संघातील कोणताही खेळाडू जर करोना पॉझिटीव्ह सापडला तर त्याला संघाबाहेर काढण्यात येणार असून त्याला इंग्लंडमध्ये नेण्यात येणार नाही. त्यामुळे खेळाडूंना आता सुरक्षित राहावे लागणार असून ते जर करोना पॉझिटीव्ह सापडले तर त्यांना इंग्लंडच्या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. भारतीय संघाचे फिजीओ योगेश परमार यांनी सांगितले की, " भारतीय संघ १९ मे या दिवशी बायो बबलमध्ये प्रवेश करू शकते. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना १० दिवसांसाठी क्वारंटाइन राहावे लागणार आहे. बायो बबलमध्ये दाखल झाल्यावर भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबियातील व्यक्तींची करोना चाचणी होणार आहे. या चाचणीत जर या व्यक्ती निगेटीव्ह आल्या तरच त्यांना इंग्लंडमध्ये जाता येणार आहे." बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे की, " बीसीसीआयने खेळाडूंना महत्वाच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार खेळाडूंना मुंबईमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची करोनाची चाचणी होणार आहे. या करोनाच्या चाचणीमध्ये जर कोणीही पॉझिटीव्ह सापडले तर त्यांच्यासाठी वेगळ्या खासगी विमानाची सोय यावेळी करण्यात येणार नाही. ज्या खेळाडूंना इंग्लंडला जायचे आहे, त्यांना मुंबईमध्ये येण्यापूर्वीही आपले करोना चाचणीचे अहवाल दाखवावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना इंग्लंडच्या दौऱ्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडूंना इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी काही दिवस क्वारंटाइन राहावे लागेल आणि त्यांना करोनाच्या चाचण्याही कराव्या लागणार आहेत." (याबाबतचे प्रथम वृत्त अमर उजाला या वृत्तसंस्थेने दिलेले आहे.)
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o6xeOU
No comments:
Post a Comment