Ads

Friday, May 14, 2021

भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाल्यावर रवी शास्त्री यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

नवी दिल्ली : भारतीय संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. या आनंदाच्या बातमीनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. या आनंदाच्या बातमीनंतर शास्त्री यांनी संगातील खेळाडूंबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. आयसीसीने गुरुवारी कसोटी क्रमवारी जाही केली, यामध्ये भारतीय संघाला एक आनंदाची बातमी मिळाली. भारतीय संघ या क्रमवारीत १२१ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. यावेळी न्यूझीलंडचा संघ फक्त एका अंकाने पिछाडीवर आहे. न्यूझीलंडच्या खात्यात १२० गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. भारतीय संघाबाबत शास्त्री म्हणाले की, " भारतीय संघ हा बिनधास्त आहे आणि त्याचा मला गर्व आहे. अव्वल स्थान पटकावण्यासाठी भारतीय संघापुढे बऱ्याच अडचणी आणि समस्या आल्या होत्या. पण भारतीय संघाने ही सर्व आव्हानं स्विकारली आणि यश मिळवले आहे. त्यामुळे जगभरात अव्वल स्थान पटकावण्यासाठी भारतीय संघ लायक आहे. अव्वल स्थान पटकावण्यासाठी संघातील खेळाडूंनी दृढ संकल्प दाखवला आहे, त्याचबरोबर त्यांनी खेळात जी एकाग्रता दाखवील त्याचेच हे फळ आहे. भारतीय संघाने कठीण काळात चांगले क्रिकेट खेळले आहे. त्याचबरोबर आयसीसीने क्रमवारीच्या नियमांमध्येही बदल केले होते, पण तरीही भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावले आहे." भारतीय संघाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत पराभवाची धूळ चारली होती. भारताने ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला होता. त्याचबरोबर भारतीय संघाने इंग्लंडलाही ३-१ असे पराभूत केले होते. भारतीय संघाने गेल्यावर्षी २४ सामने खेळले होते आणि त्यामध्ये त्यांनी सर्वाधिक २९१४ गुण पटकावले होते. न्यूझीलंडने १८ कसोटी सामन्यांमध्ये २१६६ गुण पटकावले आणि त्यांनी क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. त्यामुळे विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि ,न्यूझीलंड यांच्यामध्ये अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडमध्ये जून महिन्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QgbPWW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...