Ads

Thursday, May 13, 2021

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतणार, पण देशात पोहोचल्यावर करावी लागणार ही महत्वाची गोष्ट...

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या आयपीएलमधील खेळाडूंना त्यांच्याच देशाने प्रवेश नाकारला होता. पण आता त्यांना मायदेशात परतायला मिळणार आहे. पण मायदेशी परतल्यावर त्यांना लगेच आपल्या घरी जाता येणार नाही, असे चित्र दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने आता काही नियम बनवले आहेत आणि त्याचे पालन या आयपीएलमधील खेळाडूंना करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी १६ मे यादिवशी एका खास विमानाचे आयजोन करण्यात आले आहे. हे विमान मालदिवहून थेट सिडनीला जाणार आहे. त्याचबरोबर सिडनीला पोहोचल्यावर सर्व जणांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यांना मायदेशात पोहोचल्यावर लगेच हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहावे लागणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर खेळाडूंना हॉटेलमध्येच क्वारंटाइन व्हावे लागले तर या खेळाडूंना थेट घरी जाता येणार नाही, असे समोर येत आहे. पण याबाबत ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. खेळाडूंना क्वारंटाइन व्हावे लागणार असले तरी ते कुठे, याचे उत्तर मात्र अजूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही. बऱ्यादचा खेळाडूंना मायदेशात पोहोचल्यावर हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले जाते आणि त्यानंतरच त्यांना पुढे जाता येते, असे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण १४ खेळाडू होते, त्याचबरोबर प्रशिक्षक, पंच, सामनाधिकारी आणि समालोचक असे मिळून ३८ जण भारतामध्ये दाखल झाले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्यांना प्रवेश नाकारला होता. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने आयपीएलसाठी भारतात गेलेल्या सर्व जणांना प्रवेश बंदी केली होती. ही प्रवेशबंदी १५मेपर्यंत होती. त्यामुळे आता १६ मे या दिवशी खासगी विमानाने ऑस्ट्रेलियाच्या या सर्व व्यक्ती मायदेशी रवाना होणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय थोडीशी चिंतेत आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मायदेशात जाण्याची अनुमती मिळेल, असे सध्याच्या घडीला दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ, ऑस्ट्रेलियामधील क्रिकेटर्स संघ आणि बीसीसीआय यांना अजूनही ऑस्ट्रेलियाच्या सरकारने अजूनही याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. पण ही गोष्ट ऑस्ट्रेलियाचे सरकार करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत या गोष्टीची अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत चाहत्यांच्या मनातही धाकधुक असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33FPpS5

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...