नवी दिल्ली : भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याबाबत आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार होता. पण यामध्ये आता बदल होण्याची शक्यता आहे. कारण या दौऱ्यात आणखीन जास्त सामने खेळवण्यात यावे, असे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला वाटत आहे. त्यासाठी आता श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ बीसीसीआयबरोबर चर्चा करणार असून आपला प्रस्ताव मांडणार आहे. श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ बीसीसीआयपुढे कोणता प्रस्ताव ठेवणार, जाणून घ्या... श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला आता या दौऱ्यात जास्त सामने खेळावे असे वाटत आहे. भारत या दौऱ्यात तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार असल्याचे यापूर्वी ठरवण्यात आले होते. पण या दौऱ्यात दोन ट्वेन्टी-२० सामने वाढवण्यात यावे, असे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला वाटत आहे. त्यामुळे आता भारत आणि श्रीलंकेमध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याबाबत आता श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ बीसीसीआयबरोबर चर्चा करणार आहे. जून महिन्यात भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये जाणार आहे. इंग्लंडमध्ये भारताचा पहिला संघ न्यूझीलंडविरुद्ध विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्येच राहणार आहे. कारण इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका ऑगस्ट महिन्यात सुरु होणार आहे. पण त्याचवेळी जुलै महिन्यात भारताचा युवा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात यापूर्वी तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्याचे ठरवले होते. पण आता या दौऱ्यात पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला देण्यात यावे, यावर सध्याच्या घडीला चर्चा सुरु आहे. भारताच्या कर्णधारपदासाठी सलामीवीर शिखर धवन, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे भारताचे कर्णधारपद आता कोणाला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eIpzmQ
No comments:
Post a Comment