Ads

Sunday, May 16, 2021

चाहत्यांसाठी वाईट बातमी... भारताचा श्रीलंका दौरा होऊ शकतो रद्द, जाणू घ्या मोठे कारण

नवी दिल्ली : भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण हा दौरा आता रद्द होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. कारण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला एका गोष्टीची चिंता सतावत आहे. त्यामुळे हा दौरा आता रद्द होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार होता. यामध्ये दोन ट्वेन्टी-२० सामने वाढवावे, असे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला वाटत होते, याबाबतचा प्रस्तावही त्यांनी बीसीसीायपुढे ठेवल्याचे म्हटले जात होते. पण आता श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला करोनाची चिंता सतावत आहे. कारण करोनाच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यामुळे हा दौरा खेळवायचा की नाही, या संभ्रमात श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ आहे. श्रीलंकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढत होताना दिसत आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सामने कसे खेळवायचे, हा प्रश्न श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला पडला आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅश्ले डीसिल्व्हा यांनी सांगितले की, " सध्याच्या घडीला श्रीलंकेमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि आमच्यासाठी हा चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. भारताचा दौरा हा जुलै महिन्यात होणार आहे. तोपर्यंत वातावरण निवळेल, अशी आम्हाला आशा आहे." अॅश्ले यांनी पुढे सांगितले की, " यापूर्वी करोनाच्या वातावरणामध्ये आम्ही इंग्लंडच्या संघाबरोबर खेळलो होतो. हा दौरा यशस्वी झाला होता. त्यावेळीही करोना होता. पण आम्ही या दौऱ्याचे यशस्वीपणे आयोजन केले होते. मला विश्वास आहे की, भारताचा दौराही यशस्वी होईल. यापुढे देशातील करोनाचे रुग्ण वाढू नयेत, हीच आम्हाला आशा आहे." जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण यावेळी भारतीय संघात युवा खेळाडूंचा जास्त भरणा असेल, असे दिसत आहे. कारण यावेळीच भारताचा एक संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या संघात सर्व अनुभवी खेळाडू असणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3buUHEa

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...