Ads

Tuesday, May 11, 2021

चिनी रॉकेटच्या धमाक्याने डेव्हिड वॉर्नरसह पुरता घाबरला, म्हणाला...

नवी दिल्ली : चीनचे अनियंत्रित रॉकेट मालदिवमधील हिंद महासागरात कोसळले आणि एकच मोठा धमाका झाला. या धमाक्याने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर चांगलाच घाबरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचे आयपीएलमधील खेळाडू हे मालदिवमध्येच राहत आहेत. त्यामुळे या धमाक्याने वॉर्नरची झोपच उडाली. सध्याच्या घडीला आयपीएलमधील ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदिवमधील एका रीसॉर्टमध्ये राहत आहेत. चीनचे रॉकेटही मालदिवमध्येच कोसळले होते. पण या रॉकेटचा काही भाग हा जळून गेला होता. पण त्यानंतरही जे काही आम्ही अनुभवले ते भयावह होते, असे वॉर्नरने यावेळी म्हटले आहे. वॉर्नरने याबाबत द ऑस्ट्रेलियन या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, " ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा आम्ही झोपेत होतो. पण पहाटे पाचच्या सुमारास जोरदार धमाका झाला आणि आम्ही सर्वच घाबरलो. या धमाक्याचा जो आवाज होता तो फारच भयंकर होता. त्यामुळेच आम्हाला भिती वाटत होती आणि त्याॉनंतर आमची झोपच उडाली." नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...रविवारी सकाळच्या सुमारास या अनियंत्रित रॉकेटने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आणि मालदीवच्या समुद्रात कोसळले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. तर, नासाने चीनला अनियंत्रित झालेल्या रॉकेटवरून फटकारले आहे. चीनने जबाबदार मानकांचे पालन करण्यास अपयशी ठरल्याचे नासाने म्हटले आहे. चिनी रॉकेट लाँग मार्च 5B चे अवशेष मालदीवजवळ हिंदी महासागरात कोसळले असल्याच्या दाव्याला अमेरिकन अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. अनेकांनी या रॉकेटचे अवशेष आकाशातून कोसळताना पाहिले असल्याचा दावा केला. चीनच्याकडून या रॉकेटवरील नियंत्रण सुटले होते. त्यामुळे हे रॉकेट कोठेही कोसळणार असल्याची भीती निर्माण झाली होती. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर या रॉकेटचा बहुतांशी भाग जळून खाक झाला होता. चीनने अवकाशात पाठवलेल्या 'लाँग मार्च 5B' या रॉकेटवरील नियंत्रण सुटल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जगात खळबळ उडाली होती. करोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या अनेक देशांची या रॉकेटने चिंता वाढवली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eApTUA

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...