Ads

Tuesday, May 11, 2021

एकाच वेळी भारताचे दोन संघ खेळणार आंतरराष्ट्रीय मालिका; असा आहे लंका दौऱ्याचा कार्यक्रम

मुंबई: कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यासह अन्य वरिष्ठ खेळाडूं शिवाय भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय संघ जेव्हा श्रीलंका दौऱ्यावर जाईल तेव्हा भारताचा आणखी एक संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाच वेळी भारताचे दोन संघ मैदानात प्रथमच दिसतील. वाचा- बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काल सोमवारी यासंदर्भात माहिती दिली होती. भारताच्या लंका दौऱ्यासंदर्भात इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या रिपोर्टनुसार या दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. पहिली वनडे १३ जुलै, दुसरी १६ तर तिसरी आणि अखेरची १९ जुलै रोजी होणार आहे. २२ जुलै पासून टी-२० मालिका होणार असून २४ ला दुसरी तर २७ जुलै रोजी तिसरी आणि अखेरची टी-२० लढत होईल. अर्थात या संदर्भात बीसीसीआयने अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ ५ जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होणार आणि मालिका संपल्यानंतर २८ जुलै रोजी भारतात परत येईल. श्रीलंकेत पोहोचल्यानंतर भारतीय संघाला एक आठवड्याचे क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागले. हे सात दिवस दोन भागात विभागला जाणार आहेत. पहिले तीन दिवस सख्त क्वारंटाइन असेल. ज्यात एका रुममध्ये प्रत्येक खेळाडूला रहावे लागले. अखेरच्या चार दिवसात खेळाडू एकमेकांना भेटून सराव करू शकतील. ही सर्व प्रक्रिया बायो बबलचा भाग असलेल्या हॉटेल आणि मैदानात होईल. सध्या करोना व्हायरसची संख्या वाढत चालल्याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील लढती प्रेक्षकांशिवाय होतील. २०१८ साली निदहास ट्रॉफीनंतर भारतीय संघाचा हा पहिला श्रीलंका दौरा आहे. इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध खेळणार आहे. तेव्हा श्रीलंकेच्या संघ भारतात येणार आहे. वाचा- श्रीलंका दौऱ्यात विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, केएल राहुल आदी दिग्गज खेळाडू असणार नाहीत. यासाठी नव्या खेळाडूंची निवड केली जाणार आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच भारत अ साठी शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळू शकते. या खेळाडूंना मिळू शकते संधी शिखर धवन, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, पृथ्वी शॉ, दीपक चहर, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि राहुल तेवतिया


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w0fozF

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...