मुंबई: पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडला पोहोचल्यानंतर भारत सर्व प्रथम न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका होईल. वाचा- इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने पूर्ण प्लॅन तयार केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय खेळाडूंना १९ मे रोजी मुंबईत पोहोचायचे आहे. मुंबईत येण्याआधी खेळाडूंना तीन वेळा आरटी पीसीआर (RT-PCR tests)टेस्ट करावी लागणार आहे. वाचा- भारतीय खेळाडूंना तिनही RT-PCR टेस्ट त्यांच्या घरीच करायच्या आहेत. टेस्ट रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर ते १९ मे रोजी मुंबईसाठी रवाना होऊ शकतील. इंग्लंडला रवाना होण्याआधी खेळाडूंना १४ दिवस भारतात क्वारंटाइन रहावे लागणार आहे. त्यानंतर २ जून रोजी सर्वजण इंग्लंडसाठी रवाना होतील. इंग्लंडला रवाना होण्याआधी सर्व भारतीय खेळाडूंना करोनाची पहिली लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसरी लस इंग्लंडमध्येच देण्याची शक्यता आहे. वाचा- जडेजा आणि विहारीचा समावेश दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. निवड समितीने अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जुन नगवासवाला यांना स्टॅडबाय ठेवण्यात आला. वाचा- असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवला, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत(विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल(फिटनेसवर ठरणार), वृद्धीमान साहा (फिटनेसवर ठरणार)
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RY7Yy9
No comments:
Post a Comment