नवी दिल्ली: पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत होणार आहे. ही लढत साउथहँप्टन येथे १८ ते २२ जून दरम्यान होईल. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वाचा- भारताने WTC फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. या निवडीबद्दल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया () याने त्याचे मत सांगितले. भारतीय संघाने एक मजबूत संघाची निवड केली आहे. एकूणच भारताने चांगला संघ निवडला आहे. पण संघात मनगटने चेंडू वळवणाऱ्या फिरकीपटूचा समावेश केला नाही. वाचा- कनेरियाने इंग्लंडमधील काउंटी स्पर्धेत एसेक्सकडून सामने खेळले आहेत. इंग्लंडमधील वातावरण लेग स्पिनरसाठी अनुकूल असते. भारताकडे आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा सारखे फिरकीपटू आहेत. पण त्यांच्याकडे मनगटाने चेंडू फिरवणारा गोलंदाज नाही. इंग्लंडमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तेथे वातावरण थंड असते. मी तेथे भरपूर क्रिकेट खेळलो आहे. इंग्लंडमधील वेगवेगळ्या परिस्थिती मी आठ वर्ष काउंटी क्रिकेट खेळल्याचे कनेरिया म्हणाला. वाचा- जेव्हा सामन्याला सुरूवात होते तेव्हा विकेटवर सूर्यप्रकाश असतो. पण त्याच बरोबर विकेटवर आर्द्रता असते. तेथे जलद गोलंदाजांसोबत फिरकीपटू विशेषत: लेग स्पिनरला उपयुक्त वातावरण असते. यामुळेच मी जेव्हा काउंटी क्रिकेट खेळायतो तेव्हा यशस्वी ठरायचो. या गोष्टीमुळेच थोडा काळजीचा विषय आहे. भारतीय संघात कोणीच लेग स्पिनर नाही. वाचा- राहुल चहरचे केले कौतुक पाकिस्तानकडून फिरकीपटू म्हणून सर्वाधिक विकेट कनेरियाने घेतल्या आहेत. भारतीय संघातील फिरकीपटू () यांचे त्याने कौतुक केले. त्याची गोलंदाजी पाहता तो संघात हवा होता. न्यूझीलंडकडे इश सोढी याच्या सारखा लेग स्पिनर आहे. विराट कोहलीला लेग स्पिनर विरुद्ध खेळताना अडचण येते. राहुल गुगली, फ्लिपर आणि लेग स्पिन चांगला टाकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tGllQW
No comments:
Post a Comment