Ads

Sunday, May 2, 2021

IPL 2021 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या नेमक्या कोणत्या चुका झाल्या, धोनीने सांगितली ही कारणं

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील शनिवारचा सामना चांगलाच थरारक झाला. कारण हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला आणि मुंबईने चेन्नईवर दिमाखदार विजय साकारला. पण दोनशेपेक्षा जास्त धावा करूनही चेन्नईचा पराभव नेमका का झाला, याची कारणं आता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितली आहेत. धोनी म्हणाला की, " ही खेळपट्टी खरंच फार चागंली होती. कारण या खेळपट्टीवर मोठे फटके चांगले बसत होते. पण आमच्याकडून या सामन्यात काही चुका झाल्या आणि त्यामुळेच आम्हाला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात आमची गोलंदाजी चांगली झाली नाही. आम्हाला रणनितीनुसार या सामन्यात गोलंदाजी करता आली नाही. गोलंदाजांनी यावेळी काही चेंडू चांगले टाकले नाहीत. त्याचबरोबर सामन्यात आमच्याकडून मोक्याच्या क्षणी काही झेलही सुटले आणि याचा फटका आम्हाला बसला. त्यामुळेच हा सामना आमच्या हातातून निसटला." धोनी पुढे म्हणाला की, " आयपीएल ही एक मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत काही असे थरारक सामने आम्ही जिंकलेही आहेत आणि काही सामन्यांमध्ये आम्हाला पराभवही पत्करावा लागला आहे. या सामन्यांमधून आम्हाला शिकण्यासारखे बरेच काही आहे. आमच्या संघाची नजर कधीच गुणतालिकेवर नसते. आम्ही प्रत्येक सामन्याच्यावेळी फक्त त्या लढतीचाच विचार करत असतो. या सामन्यात आम्हाला कशी चांगली कामगिरी करता येईल, याकडेच आमचे लक्ष असते. त्यामुळे गुणतालिकेकडे आम्ही कधीही पाहत नाही." मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही चेन्नईचा संघ पाच विजयांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत मोठी धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्सकडून यावेळी कायरव पोलार्डने धडाकेबाज खेळी साकारली आणि मुंबई इंडियन्सला चार विकेट्स राखून विजय मिळवून दिला. पोलार्डने या सामन्यात फक्त ३४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद ८७ धावांची दमदार खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aTViis

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...