Ads

Wednesday, May 12, 2021

इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या भुवनेश्ववर कुमारची भारतीय संघात निवड का झाली नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्ववर कुमारने इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर आयपीएलमध्येही भुवनेश्वरने चांगली गोलंदाजी केली होती. पण तरीही भारतीय संघामध्ये भुवनेश्ववरची निवड करण्यात आली नाही, यामागचे मोठे कारण आता समोर आले आहे. भुवनेश्ववर हा भारताचा एक अनुभवी गोलंदाज आहे आणि भारतीय संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात त्याची निवड करण्यात आली नाही. कारण बीसीसीआयने यावेळी भुवनेश्ववरवर विश्वास दाखवला नाही. या गोष्टीमागचे मोठे कारण आता समोर आले आहे. कारण २०१८ नंतर भुवनेश्ववर भारतासाठी एकही कसोटी मालिका खेळू शकलेला नाही. भुवनेश्ववरबाबत आता एक मोठी गोष्ट पुढे आली आहे. आयएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्ववर हा कसोटी सामने खेळण्यासाठी सध्याच्या घडीा पूर्णपणे फिट नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्याची निवड भारतीयस संघात करण्यात आलेली नाही. भारतीय संघ चार महिन्यांच्या मोठ्या दौऱ्यावर इंग्लंडला जाणार आहे. त्यामध्ये जर भुवनेश्ववर पुन्हा अनफिट ठरला तर त्याला पुन्हा भारतामध्ये आणावे लागू शकते. त्याचबरोबर भारतीय संघात मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरसारखे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे भुवनेश्वरची उणीव त्यांना जाणवणार नाही. पण आता भुवनेश्वर कुमार भारतीय कसोटी संघात कधी पुनरागमन करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल. कारण भुवनेश्वरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भुवनेश्ववरच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. २०१८ सालानंतर तो भारताच्या कसोटी संघामधून बाहेर आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी आयपीएलमध्येही त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो सातत्याने भारतीय संघात खेळू शकलेला नाही. त्याचबरोबर सध्याच्या घडीला कसोटी संघात नसल्यामुळे त्याचा विचार यावेळी निवड समितीने केलेला नाही. त्यामुळेच भुवनेश्ववरला भारतीय संघात यावेळी स्थान देण्यात आलेले नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fgvoH6

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...