Ads

Thursday, May 13, 2021

कोल्ह्याला द्राक्ष आंबट; भारतीय खेळाडूंनी लक्ष विचलीत केलं म्हणून आमचा पराभव झाला- टीम पेन

सिडनी: भारतीय क्रिकेट संघाने जानेवारीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका २-१ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांचा पराभूत करण्याचा पराक्रम अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केला होता. विशेष म्हणजे या मालिकेती पहिल्या लढतीत भारताचा फक्त ३५ धावांवर ऑलआउट झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. वाचा- भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत विजय मिळून मालिका बरोबरीत केली. त्यानंतर तिसरी कसोटी ड्रॉ केली आणि अखेरच्या गाबा ( ) कसोटीत शानदार विजय मिळवला. या मालिकेत भारताचे अनेक स्टार खेळाडू संघात नव्हते. तरी देखील ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. या पराभवावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार यांने भारतीय संघावर टीका केली आहे. वाचा- अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला विरोधी संघाचे लक्ष विचलित कसे करायचे हे चांगलेच माहिती आहे. भारतीय संघाविरुद्ध खेळण्यातील अनेक आव्हानांपैकी एक म्हणजे ते विरोधी संघाचे गरज नसताना लक्ष विचलित करतात. मालिकेत असे अनेक प्रसंग आले ज्यात आम्ही अडकले. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, जेव्हा असे वृत्त आले की ते (भारतीय खेळाडू) गाबा येथे जाण्यास उत्सुक नाहीत. आम्हाला कल्पना नव्हती की पुढील मॅच आम्ही कुठे खेळणार आहोत. भारतीय संघ अशा पद्धतीने विरोधी संघाचे लक्ष मॅचवरून विचलित करतात. वाचा- भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी २०१८-१९ साली विराटच्या नेतृत्वाखाली भारताने २-१ अशी मालिका जिंकली होती. यावेळी विराट पहिल्या कसोटीनंतर भारतात परतला आणि अजिंक्यकडे नेतृत्व देण्यात आले. संपूर्ण मालिकेत संघातील अनेक खेळडू दुखापतीमुळे बाहेर होते. अशात टीम इंडियाने युवा खेळाडूंच्या जोरावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वत:कडे कायम राखली. कालच (बुधवारी) ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी देखील कसोटी मालिकेतील ऑस्ट्रेलियाच्या पराभवाबद्दल आणि भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रवीड यांच्याबद्दल भाष्य केले होते. राहुलने ऑस्ट्रेलियाच्या धोरणांचा वापर करून भारतातील देशांतर्गत क्रिकेट मजबूत केले. यामुळे राष्ट्रीय संघाला सातत्याने दर्जेदार खेळाडू मिळत आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o9uoZy

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...