Ads

Wednesday, May 12, 2021

हार्दिक पंड्याला मोठा धक्का, प्रशिक्षकांनीच सांगितले संघाला सापडला हा चांगला अष्टपैलू खेळाडू

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला आता मोठा धक्का बसला आहे. कारण हार्दिकच्या जागी आता संघाला एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडला असल्याची गोष्ट आता प्रशिक्षकांनीच सांगितली आहे. त्यामुळे आता लवकरच हार्दिक पंड्याचा संघातील पत्ता कट होऊ शकतो, असे दिसत आहे. हार्दिक हा एक अष्टपैलू खेळाडू असला तरी गेले काही महिने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे आता हार्दिक आता अष्टपैलू खेळाडू राहीलेला नाही तर तो एक फलंदाज उरला आहे, अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. हीच गोष्ट कुठेतरी भारताच्या संघालाही जाणवत आहे. त्यामुळे हार्दिकच्या जागी संघाला एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडला आहे, असे वक्तव्य प्रशिक्षकांनीच केले आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी यावेळी सांगितले की, " पाठिच्या दुखण्यामुळे हार्दिक पंड्या गोलंदाजी करताना दिसत नाही. पण भारतीय संघातील शार्दुल ठाकूर हा एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला आहे. कारण शार्दुलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी तर केलीच आहे, पण तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो, ही गोष्टही आता समोर आली आहे. त्यामुळे शार्दुल हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला आहे." अरुण यांनी पुढे सांगितले की, " निवड समिती हे खेळाडू निवडण्याचे काम करत असते. त्यानंतर संघात आल्यावर खेळाडूवर आम्ही योग्य ते संस्कार करत असतो. पण माझ्यामते शार्दुलने एक गोष्ट सिद्ध केली आहे आणि ती म्हणजे तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता त्याच्यावर सर्वांचे लक्ष असेल." हार्दिकबाबत अरुण यांनी यावेळी सांगितले की, " हार्दिक २०१८ साली झालेल्या इंग्लंडच्या दौऱ्यात खेळला होता. पण त्यानंतर २०१९ साली झालेल्या आयपीएलमध्ये त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. त्यानंतर हार्दिकच्या पाठिवर शस्त्रक्रीया करण्यात आली आणि त्यामुळेच तो बराच काळ गोलंदाजी करु शकलेला नाही. हार्दिक हा एक प्रतिभावान खेळाडू आहे, पण पाठिच्या शस्त्रक्रीयेनंतर त्यांचे संघात पुनरागमन होणे सोपे नसेल."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hgpGb0

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...