Ads

Friday, May 7, 2021

पृथ्वी शॉचे होऊ शकते भारताच्या संघात पुनरागमन, आज निवडण्यात येणार इंग्लंड दौऱ्यासाठीचा संघ

नवी दिल्ली : पृथ्वी शॉ याने आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे आज निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. भारतीय संघ आता थेट आपल्याला इंग्लंडच्या दौऱ्यावर जाताना दिसणार आहे. इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत पृथ्वी शॉ याला संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. इंग्लंडच्या दौऱ्यासाठी भारताचा जम्बो संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे या संघात ४-५ सलामीवीर असून शकतात. यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, अभिमन्यु ईश्वरन, प्रियंक पंचाल व देवदत पडिक्कल ही संभाव्य नावं आता समोर आली आहेत. भारताच्या मधल्या फळीत मात्र मोठा कोणताही बदल होणार नाही, असेच दिसत आहे. कारण मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, लोकेश राहुल यांचा समावेश करण्यात येऊ शकतो. या दौऱ्यासाठी भारताच्या संघात ७-८ वेगवान गोलंदाजांनाही संधी मिळू शकते, असे दिसत आहे. संभाव्य वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट यांचा समावेश करण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर नेट गोलंदाज म्हणून चेतन सकारिया, अंकित राजपूत यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतासाठी यावेळी अष्टपैलू खेळाडू हे महत्वाचे असतील. संभाव्य अष्टपैलू खेळाडूंमध्ये वाशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रविंद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे, त्याचबरोबर अक्षर पटेल आणि राहुल चहर हे दोन फिरकीपटूही संघात असतील, असे म्हटले जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये नॉटिंगहॅम येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना १२ ते १६ ऑगस्ट या दिवसांमध्ये लॉर्ड्सवर होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ते २९ ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये लीड्सच्या मैदानात होणार आहे. इंग्लंडच्या दौऱ्यातील भारताचा चौथा सामना २ ते ६ सप्टेंबर या दिवसांमध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील अखेरचा सामना हा १० ते १४ या कालावधीत होणार आहे. या कसोटी मालिकेनंतर आयपीएल खेळवण्यात येण्याची चर्चा सुरु आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SzC6Av

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...