नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सने आपल्या संघातील सर्व खेळाडूंची घरी जाण्याची सोय केली आहे. पण तरीही मुंबई इंडियन्सला संघातील दोन खेळाडूंची सर्वात जास्त चिंता असणार आहे. या दोन खेळाडूंचीही व्यवस्था मुंबई इंडियन्सने केली असली तरी त्यांना मायदेशात प्रवेश कधी मिळणार, याची चिंता त्यांना असेल. मुंबई इंडियन्सने आपल्या सर्व खेळाडूंची घरी पोहोचण्याची खासगी विमानाने व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर परेदशी खेळाडूंसाठीही त्यांनी खास विमानांची सोय केली होती. पण मुंबई इंडियन्सच्या संघातील दोन खेळाडू असे आहेत की, त्यांना अजूनही आपल्या घरी पोहोचता आलेले नाही. त्यामुळे हे खेळाडू जोपर्यंत घरी जाऊ शकणार नाहीत. तोपर्यंत मुंबई इंडियन्सला चिंता असेल. ऑस्ट्रेलियाने आयपीएलमधील खेळाडूंना आपल्या देशात प्रवेश बंदी केली आहे. आता १५ मेपर्यंत आयपीएलच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये पाय ठेवता येणार नाही. त्याचबरोबर हा कालावधी जर वाढवण्यात आला तर मुंबई इंडियन्सच्या संघातील ख्रिस लीन आणि नॅथन कल्टर नाइल या दोन ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे काय होणार, ही चिंता मुंबई इंडियन्सच्या संघाला असेल. ऑस्ट्रेलियाचे ३८ खेळाडू, पंच, प्रशिक्षक, सामनाधिकारी हे सर्व जण आता मालदिव या देशात राहिले आहेत. काही दिवस त्यांना मालदिवचा आसरा घेतला आहे. पण जर ऑस्ट्रेलियाने विमानबंदीची मदत वाढवली तर या सर्वांचे नेमके काय होणार, हा सर्वात मोठा प्रश्न असेल. कारण आतापर्यंत बाकीच्या देशातील सर्व खेळाडू आतापर्यंत आपल्या मायदेशी परतत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चिंता सर्वांना असेल. त्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियानेदेखील या खेळाडूंसाठी प्रयत्न केले होते. पण त्यानंतर मात्र त्यांना नमते घ्यावे लागले. कारण ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कडक विमानबंदी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आता किती दिवस मालदिवमध्ये राहावे लागेल, हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आता सर्वांना प्रथम १५मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यादिवशीच ऑस्ट्रेलयाच्या खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tvZdZl
No comments:
Post a Comment