Ads

Thursday, May 13, 2021

BREAKING NEWS : भारताच्या महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची निवड

मुंबई : भारताच्या महिला संघाच्या प्रशिक्षकपदी मुंबईच्या रमेश पोवार यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ सालीही पोवार यांची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. पण त्यावेळी काही वाद झाले असल्याचे म्हटले जात होते. पण आता पुन्हा एकदा पोवार यांच्याकडे भारताच्या महिला संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. भारतीय महिला संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून तुषार आरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याजागी भारताचा माजी ऑफस्पिनर रमेश पोवारची नियुक्ती २०१८ साली करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपपर्यंत पोवारकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. पोवारने ३१ वनडे व दोन कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २००४ ते २००७ या कालावधीत तो राष्ट्रीय संघातून खेळला आहे. वनडे क्रिकेटमध्ये ३४ विकेट्स त्याच्या नावावर जमा आहेत. भारतीय महिला क्रिकेटपटू कर्णधार मिताली राजने प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर आपल्या निवडीबाबत दुजाभाव केल्याचे आरोप केले होते. काही जण पदाचा गैरवापर करत मला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, अशा शब्दांत तिने बीसीसीआय सीइओ राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक साबा करीम यांना पत्र लिहून आपला उद्वेग व्यक्त केला होता. प्रशिक्षक रमेश पोवार यांनी आपल्याला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली, हे सांगत त्याची उदाहरणेच मितालीने या पत्रात मांडली होती. कोच रमेश पोवार यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगत मितालीने खूप उदाहरणं दिली होती. ती म्हणाली होती की, 'मी नेटमध्ये प्रॅक्टिस करताना पोवार निघून जायचे. मी बोलायला गेले तर ते फोनमध्ये बिझी व्हायचे किंवा निघून जायचे. हे खूपच अपमानास्पद होते. २० वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच माझा आत्मविश्वास खचला, मला नैराश्य आले. मी केलेल्या देशाच्या सेवेला खरंच इतकीही किंमत नव्हती का की काहीजण सत्तेचा वापर करून मला बर्बाद करायला निघाले, असा विचार करायला मला त्यांनी भाग पाडले'


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ocUWsG

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...