Ads

Wednesday, May 12, 2021

'धोनी निवृत्त झाल्यापासून मी आणि चहल एकत्र खेळलो नाही'

नवी दिल्ली: पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड झाली असून या संघात फिरकीपटू कुलदीप यादवला स्थान दिले गेले नाही. WTC फायनलनंतर भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी देखील यादवचा विचार केला गेला नाही. भारताचा हा फिरकी गोलंदाज सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याला फक्त एक विकेट घेता आली होती. वाचा- आयपीएल २०२१मध्ये कुलदीपला कोलकाता नाइट रायडर्सकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता ही स्पर्धा देखील स्थगित करण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कुलदीपने सांगितले की, मैदानात आणि बाहेर महेंद्र सिंह धोनीचा सल्ला तो फार मिस करतोय. विकेटच्या मागून धोनी देत असलेला सल्ला त्याला खुप उपयोगी पडायचा. आता धोनी नसल्याने त्याची कमतरता जाणवते. वाचा- धोनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ऋषभ पंतने धोनीकडून जबाबदारी घेतली. मला धोनीच्या सल्ल्याची कमतरता नेहमी जाणवते. त्याच्याकडे खुप अनुभव होता. तो विकेटच्या मागून आम्हाला मार्गदर्शन करत असे. त्याचा अनुभव आता मिळत नाही. धोनीच्या जागी आता पंत आहे. तो जितका जास्त खेळेल तितका आम्हाला सल्ला देऊ शकेल. मला वाटते की प्रत्येक गोलंदाजाला एका पार्टनरची गरज असते जो दुसऱ्या बाजूने प्रतिसाद देईल. वाचा- जेव्हा धोनी संघात होता तेव्हा मी आणि चहल एकत्र खेळायचो. जेव्हापासून त्याने क्रिकेट सोडले मी आणि चहल एकत्र खेळलो नाही. धोनी गेल्यानंतर मी फार कमी सामने खेळले. या काळात मी १० पेक्षा कमी सामने खेळले आहेत. मी हॅटट्रिक देखील घेतली. तुम्ही माझ्या एकूण कामगिरीकडे पाहिले तर ती चांगली आहे. वेगवेगळे पाहिले तर ती चांगली वाटणार नाही. वाचा- ज्या सामन्यात मी खेळू शकेन असे वाटत होते अशा सामन्यात मला खेळण्याची संधी मिळाली नाही. आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की कोणत्या संघाविरुद्ध खेळत आहोत, असे यादव म्हणाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f5L3sE

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...