Ads

Sunday, November 15, 2020

आयपीएल खेळवल्यामुळे युएईचे क्रिकेट मंडळ झाले मालामाल, पाहा बीसीसीआयने किती कोट्यावधी रुपये दिले...

नवी दिल्ली : करोनाच्या काळातही आयपीएल यशस्वीपणे पार पडली. करोनामुळे आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. पण यामुळे आता युएईचे क्रिकेट मंडळ चांगलेच मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण बीसीसीआयने आयपीएल खेळवण्यासाठी युएईच्या क्रिकेट मंडळाला किती कोट्यावधी रुपये दिले, याचा आकडा आता समोर आला आहे. आयपीएलचा एक सामना खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रत्येक राज्य संघटनेला एक कोटी रुपये देत असते. पण यावर्षी बीसीसीआयने या रक्कमेमध्ये जवळपास ३० ते ५० लाख रुपयांनी वाढ केली होती. यापूर्वी संपूर्ण आयपीएलसाठी बीसीसीआय विविध राज्य संघटनांना ६० कोटी रुपये देत असते. पण या वर्षी ही रक्कम वाढवण्यात आली. त्यामुळेच बीसीसीआयने युएईच्या क्रिकेट मंडळाला जवळपास १०० कोटी रुपये दिल्याचे म्हटले जात आहे. याबाबाबतचा अधिकृत खुलासा बीसीसीआय किंवा युएईच्या क्रिकेट मंडळाने केलेला नाही. यावर्षी जर आयपीएल झाली नसती तर बीसीसीआयला जवळपास ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असते. पण यावेळी युएईच्या क्रिकेट मंडळाने मदतीचा हात पुढे केला आणि आयपीएल खेळवली गेली. त्यामुळे बीसीसीआयला एवढे मोठे नुकसान टाळता आले. यावर्षी आयपीएल खेळवताना बीसीसाआयला नक्कीच फायदा झाला असेल, पण त्याची टक्केवारी मात्र कमी असू शकते, असे म्हटले जात आहे. कारण बीसीसीआयला युएईच्या क्रिकेट मंडळाला मोठी रक्कम मोजावी लागली. त्याचबरोबर अन्य बरेच खर्च बीसीसीआयला करावे लागले. बीसीसीआयला यावेळी कमी फायदा झाला असला तरी मोठे नुकसान टळले, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण करोनाच्या काळात बऱ्याच क्रिकेट मंडळांना खर्च पेलवत नव्हता. पण बीसीसीआय मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये असल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर आयपीएल खेळवल्याचा काही प्रमाणात आर्थिक फायदाही बीसीसीआयला झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने जो आयपीएल खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला तो चांगला यशस्वी झाला, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआयला युएइ क्रिकेट मंडळाला एवढी मोठी रक्कम मोजणे नुकसानकारक नसल्याचेही म्हटले जात आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f83exB

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...